शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गुरूजींकडेच विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाची धुरा, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:21 IST

राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे.

अमरावती - राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. विद्यार्थ्यांना याच सत्रात दूध भुकटी वाटपाचे धोरण असल्याने ही धुरा प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या खिचडी वाटपातून कसेबसे गुरूजींची सुटका होत नाही तोच आता नव्याने दूध भुकटी वाटपाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा शिक्षणात वर्तुळात सुरू झाली आहे. पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे राज्यातील शिक्षणाधिकाºयांना शाळास्तरावर ही योजना राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपासंदर्भात पुरवठादार नियुक्त करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवायची आहे. परिशिष्ट ‘अ’मध्ये तालुकानिहाय इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या, शाळा आणि गावाचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, प्रति विद्यार्थी ६०० ग्रॅम प्रमाणे आवश्यक दूध भुकटी किलो ग्रॅमची मागणी नोंदवावी लागणार आहे. परिशिष्ट ‘ब’मध्ये जिल्ह्याची एकत्रित मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयास दोन प्रतिमध्ये सादर करावी लागणार आहे. यात तालुक्याचे नाव गटशिक्षणाधिकाºयांचे नाव, मोबाईल क्रमांक, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पटसंख्या, प्रति विद्यार्थी ६०० ग्रॅम प्रमाणे आवश्यक दूध भुकटी किलो ग्रॅमचा समावेश अनिवार्य केला आहे. शाळास्तरावर एकही विद्यार्थी दूध भुकटीपासून वंचित राहू नये, त्याकरिता अचूक पटसंख्या आणि त्यानुसार दूध भुकटीची मागणी नोंदवावी लागणार आहे. मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाºयांना प्राथमिक शिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत शिक्षण संचालनालयाकडे विद्यार्थी पटसंख्येची माहिती पाठवावी लागेल, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान यांनी कळविले आहे.

ई- निविदेसाठी लगीनघाई कशाला?राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत दूध भुकटी वाटप करण्याच्या योजनेला २३ आॅगस्ट २०१८ रोजी मूर्तरूप मिळाले. मात्र, दूध भुकटी वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आता शिक्षण विभागाने लगीनघाई सुरू केली आहे. अगोदर पुरवठादार शोधायचा नंतर योजना मंजूर करायची, अशा प्रकार दूध भुकटी वाटपात तर सुरू नाही, अशी शंका वर्तविली जात आहे. शाळा सत्र सुरू होऊन सहा महिने लोटले असताना आता मध्येच दूध भुकटी वाटप कुणासाठी, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शालेय शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांचा डेटा असताना नव्याने पटसंख्येची माहिती हा नवा प्रयोग का? यातच गुपित दडलं असल्याचे बोलले जात आहे. दूध भुकटी वाटप योजनेमागे सुपीक डोकं कुणाचे याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :milkदूधAmravatiअमरावती