शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

रेल्वेत बोगस ‘जात’ चोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयास पत्र; बनावट कर्मचा-यांची बडतर्फी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:29 IST

रेल्वेत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे आदेश आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागाने पाच वर्षांत ३६ पैकी एकालाच घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

अमरावती : रेल्वेत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे आदेश आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागाने पाच वर्षांत ३६ पैकी एकालाच घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत येणा-या अमरावती रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्ष पर्यवेक्षक शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी रेल्वेने बडतर्फ केले. मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई केली. मात्र, भुसावळ रेल्वे विभागांतर्गत अजूनही ३५ अधिकारी-कर्मचारी ‘जात’ चोरून खुर्च्यांवर कायम आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल याचिकाकर्ते नंदराज मघाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहून उपस्थित केला. अमरावती व नागपूर विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समितीद्वारे जारी करण्यात आलेल्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वेत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आणि त्यानंतर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०१२ मध्ये याचिकेवर सुनावणी करताना रेल्वेत ‘जात’ चोरून नोकरी बळकाविणारे अधिकारी, कर्मचाºयांच्या जात पडताळणीचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाने अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचा-यांना नोटीस बजावून त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली व यानंतर या एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्यात आले. 

नागपूर, अमरावती जात पडताळणी समिती संशयाच्या भोव-यातबनावट जात प्रमाणपत्रावर रेल्वेत नोकरी बळकावल्याप्रकरणी नागपूर व अमरावती येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या संशयाच्या भोव-यात आल्या आहेत. 

‘‘पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकाविणारे अधिकारी-कर्मचारी बडतर्फ करून त्यांनी घेतलेल्या सुविधांचा रोखीने परतावा घ्यावा, असे आदेश दिले होते. मात्र, भुसावळ रेल्वे प्रशासनाने अतिशय संथगतीने कारवाई चालविली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर यांना पत्र पाठवून वस्तुस्थिती कळविली आहे.- नंदराज मघाळेयाचिकाकर्ता तथा सेवानिवृत्त अधिकारी, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावती