शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अंजनगावात भोंग्याचा गोंगाट कमी; जिल्ह्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार/वनोजा बाग : भोंग्यामुळे राज्यस्तरावर उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी शहरातील मशिदींमध्ये गुरुवारी सकाळी लाऊड स्पीकरवरून अजान बंद करून नमाज अदा करण्यात आली. चांदूर बाजारसह जिल्हाभरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर हाच कित्ता गिरवित सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिला.अंजनगावात बुधवारी सायंकाळी यासंबंधी झालेल्या सभेत पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत न्यायालयाच्या निर्देशांबाबत माहिती दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे व अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याप्रसंगी काजी अब्दुल कलीम, नजीर अहमद, मौलवी शेख हुसैन, काजी अब्दुल शकील, मोहम्मद मोहसिन, पप्पू भाई, आरिफ टेलर, अजहरुद्दीन, अब्दुल लतीफ आदी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी गुरुवारी सकाळी  ५ ची अजान बंद केली. दुपारीदेखील कमी आवाजात लाऊड स्पीकरवर अजान घेतली. दोन्ही समुदायाच्या संयत भूमिकेमुळे प्रक्षोभक घटनेची नोंद झाली नाही. चांदूर बाजार शहरात गुरुवारी सकाळी ६ ची नमाज भोंग्याविना झाली. शहरातील मशिदींच्या मौलवींसोबत ठाणेदार सुनील किनगे यांनी बुधवारी सायंकाळी बैठक घेतली.

हनुमान चालिसाचे पठण झालेच नाही बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली. 

जुळ्या शहरात पहाटेची नमाज शांततेत परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांसह चिखलदरा तालुक्यात  गुरुवारी सकाळची नमाज भोंगा न वाजता झाली, असा पोलिसांचा अहवाल आहे. अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत ७१, तर चिखलदऱ्यात तीन मशिदी आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मशिदींच्या मौलवींची समन्वय बैठक घेण्यात आली. यात न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंग्याविना नमाज अदा करण्याचा निर्णय पुढे आला. नागरिकांचा सुयोग्य प्रतिसाद आहे. - सुनील किनगे, ठाणेदार, चांदूर बाजार

 

टॅग्स :Policeपोलिस