शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

गाव सोडले, कामासाठी पुन्हा गाठले मुंबई, पुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

(असाईनमेंट) इंदल चव्हाण- अमरावती : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे येथून आलेले जिल्ह्यातील कामगार आता ...

(असाईनमेंट)

इंदल चव्हाण- अमरावती : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे येथून आलेले जिल्ह्यातील कामगार आता नोकरीच्या ठिकाणी परतू लागले आहेत.

पहिली लाट ओसरल्यानंतर बरेचसे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परतले होते. मात्र, दुसरी लाट गतीने वाढीस लागल्यानंतर अनेकांनी परत गावी येणे पसंत केले. आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्याने हजारो कामगार व लहान-मोठे व्यावसायिक आता परतू लागले आहेत.

बॉक्स

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे

अमरावती जिल्ह्यात बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यातून कामगारांचे स्थलांतर पुन्हा होऊ लागले आहे.

या काळात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या भागातील लोक आलेले होते. ते आता नोकरीसाठी पुन्हा परतू लागले आहेत.

--

शिक्षणासाठी विद्यार्थी गेले परदेशात

अमरावतीतून शेकडो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लंड, चीन, सेशेल्स, अमेरिका, कॅनडा, जर्मनी या देशांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन पुन्हा परदेशात उच्चशिक्षणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

--

मुले देश परदेशात, चिंता पालकांची

कोट

मी मूळचा घुई (जि. यवतमाळ) येथील रहिवासी. अमरावतीत १० वर्षांपासून आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद राहिल्याने कुटुंबासह मूळ गावी परतून शेती व्यवसाय सुरू केला. शेती व्यवसाय उपाशीही ठेवत नाही. त्यामुळे आता तेच सुरू आहे. अमरावतीत परतणार नाही.

- दिनेश राठोड, नोकरदार

माझी मुलगी दोन वर्षांपासून मुंबई येथे कंपनीत जॉब करते. कोरोनाकाळात तिने अमरावतीत राहूनच ऑनलाईन वर्क फ्रॉम होम केले. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कंपनीत जॉब सुरू केला आहे. त्या भागातील लोक फारसे बाहेर पडत नाही. तरीही आई म्हणून तिची चिंता वाटते.

- अंजली गढीकर, आई