शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

एलबीटी हद्दपार; दर कायम

By admin | Updated: August 2, 2015 00:34 IST

राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे.

पिळवणूक : व्यापारीमुक्त, जनतेला केव्हा मिळणार दिलासा ?अमरावती : राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना न्याय मिळाला असला तरी जनतेला दिलासा केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १ आॅगस्टपासून राज्यातून एलबीटी रद्द झाल्याची घोषणा केली. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. या घोषणेच्या अनुषंगाने महापालिकांनी व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीची प्रक्रिया गुंडाळली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सुमारे १० हजार व्यापारी मुक्त झाले आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत अद्यापही एलबीटीसह वस्तुंचे दर आकारले जात असल्याने जनतेची लूट होत आहे. एलबीटीमुळे शहरातील व्यापार संपुष्टात येत असल्याची व्यापाऱ्यांची ओरड व्यापाऱ्यांची होती. त्यामुळेच राज्यात सत्तेवर आल्यास एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. एलबीटी बंद करताना व्यापाऱ्यांना अभय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १५ आॅगस्टपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे हित जोपासले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, जनतेलाही दिलासा मिळायला हवा.