शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी हद्दपार; दर कायम

By admin | Updated: August 2, 2015 00:34 IST

राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे.

पिळवणूक : व्यापारीमुक्त, जनतेला केव्हा मिळणार दिलासा ?अमरावती : राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना न्याय मिळाला असला तरी जनतेला दिलासा केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १ आॅगस्टपासून राज्यातून एलबीटी रद्द झाल्याची घोषणा केली. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. या घोषणेच्या अनुषंगाने महापालिकांनी व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीची प्रक्रिया गुंडाळली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सुमारे १० हजार व्यापारी मुक्त झाले आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत अद्यापही एलबीटीसह वस्तुंचे दर आकारले जात असल्याने जनतेची लूट होत आहे. एलबीटीमुळे शहरातील व्यापार संपुष्टात येत असल्याची व्यापाऱ्यांची ओरड व्यापाऱ्यांची होती. त्यामुळेच राज्यात सत्तेवर आल्यास एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. एलबीटी बंद करताना व्यापाऱ्यांना अभय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १५ आॅगस्टपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे हित जोपासले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, जनतेलाही दिलासा मिळायला हवा.