शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

एलबीटी हद्दपार; दर कायम

By admin | Updated: August 2, 2015 00:34 IST

राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे.

पिळवणूक : व्यापारीमुक्त, जनतेला केव्हा मिळणार दिलासा ?अमरावती : राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना न्याय मिळाला असला तरी जनतेला दिलासा केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १ आॅगस्टपासून राज्यातून एलबीटी रद्द झाल्याची घोषणा केली. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. या घोषणेच्या अनुषंगाने महापालिकांनी व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीची प्रक्रिया गुंडाळली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सुमारे १० हजार व्यापारी मुक्त झाले आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत अद्यापही एलबीटीसह वस्तुंचे दर आकारले जात असल्याने जनतेची लूट होत आहे. एलबीटीमुळे शहरातील व्यापार संपुष्टात येत असल्याची व्यापाऱ्यांची ओरड व्यापाऱ्यांची होती. त्यामुळेच राज्यात सत्तेवर आल्यास एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. एलबीटी बंद करताना व्यापाऱ्यांना अभय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १५ आॅगस्टपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे हित जोपासले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, जनतेलाही दिलासा मिळायला हवा.