शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची पळवाट, व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:21 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एफएक्यू प्रतवारीच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत असताना नॉन एफएक्यूसाठी मात्र कोणतेच धोरण नाही.

ठळक मुद्देयंत्रणांसमोर पेच : बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची बेभाव खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एफएक्यू प्रतवारीच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत असताना नॉन एफएक्यूसाठी मात्र कोणतेच धोरण नाही. हीच कायद्याची पळवाट व्यापाºयांच्या पथ्थ्यावर पडल्याने शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे. याविषयी आता जिल्हा उपनिबंधकांनी निकषातील फरकाचे आधारभूत दराविषयी पणन संचालकाकडे मार्गदर्शन मागविले आहे.जिल्ह्यात नाफेडद्वारा शासन खरेदीचे १२ केंद्र तालुकास्तरावर सुरू करण्यात आले. मात्र याठिकाणी शासन निकषानुसार अटी व शर्तींनुसारच सोयाबीनची खरेदी सुरू आहे. यामध्ये प्रमुख अट आर्द्रतेची आहे. १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते तेव्हाच हमीभाव म्हणजेच ३०५० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. मात्र यापेक्षा थोडा जरी फरक असल्यास सोयाबीन नाकारले जाते. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक बाजारात व्यापाºयांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. या ठिकाणी मात्र शेतकºयांची नड पाहून अगदी १५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी यंदाच्या हंगामात झालेली आहे. नॉन एफएक्यू सोयाबीनच्या बाबतीत ग्रेडेशन कसे करावे तसेच या प्रतवारीच्या सोयाबीनमध्ये दरात तफावत किती असावी, याविषयी कोणतेच शासन धोरण नसल्यामुळेच व्यापाºयांद्वारा शेतकऱ्यांची हजार ते दीड हजारांच्या फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे. याविषयी सातत्याने शेतकºयांच्या तक्रारी असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी नॉन एफएक्यू प्रतवारीचे सोयाबीन ग्रेडेशन करताना आधारभूत दरात फरकाची निश्चिती करावी, याविषयीचे मार्गदर्शन पणन संचालकाकडे मागितले आहे.असे आहे एफएक्यूचे शासन निकषसोयाबीन हे फॉरेन मॅटर अ‍ॅन्ड इम्पुरीटीज २ टक्के, श्रीवेल्ड इमॅच्युअर बीन्स अ‍ॅन्ड डीसकलरल्ड ५ टक्के, डॅमेज अ‍ॅन्ड विविल्ड बीन्स ३ टक्के, मेकॅनिकली डॅमेज बीन्स १५ टक्के व मॉईश्चर १२ टक्के असावे असा निकष आहे. त्यानंतरच केंद्रावर शासन खरेदी होते व अधारभूत किंमत मिळते. अन्यथा सोयाबीन नाकारण्यात येत असल्यामुळेच शेतकºयांची व्यापाºयांद्वारा बेभाव खरेदी करण्यात येते.तरच विक्रीला परवानगीज्या बाजार समितीमध्ये आवक जास्त आहे त्याच ठिकाणी नॉन एफएक्यु प्रतवारीचा माल विक्रीसाठाी येण्याची शक्यता जास्त आहे.हे सोयाबीन प्रमाणित करण्यासाठी सहायक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव पाहणी करून प्रमाणित करील व त्यानंतरच लिलावास परवानगी दिल्या जाते. मात्र या शासन नियमाला सर्वच ठिकाणी खो दिल्या जातो.एफएक्यू व नॉन एफएक्यूचे निकषात असलेल्या फरकानुसार त्याची आधारभूत किंमत ठरविली जावी व प्रत्येक बाजार समितीमध्ये ग्रेडरचे पद निर्मिती व्हावी, याविषयी शासनाला कळविले आहे.- गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Farmerशेतकरी