शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

पतीशी भेट शेवटची; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:00 IST

Amravati : अमरावतीच्या भीषण अपघातात मृतांच्या ३ महिलांमध्ये पल्लवी सुद्धा एक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये डॉ पल्लवी कदम (३२) यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा ११ जुलैला एमआयडीसी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला. आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड वार्तादेखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले हे दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते. परंतु, अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांनादेखील हिरावून नेले. 

डॉ. पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील दोन वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. मूळच्या आष्टी (ता. वर्धा) येथील त्या रहिवासी. लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्य सेवा देत होत्या. मात्र, विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू केला. कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या पहाटे ५ वाजताच्या खासगी बसने नेहमीच प्रवास करीत होत्या. 

आठ दिवसांपूर्वीच पल्लवी आणि राहुल या दाम्पत्याच्या जीवनवेलीची कळी खुलल्याची गोड वातदिखील त्यांना समजली होती. सोमवारी राहुल त्यांना खासगी ट्रॅव्हल्सवर सोडले. त्यातेली स्मिताम्य करीत त्यांनी पतीला निरोप दिला. ती त्यांची अखेरची भेट ठरली. डॉ. पल्लवी यांचा मृतदेह सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर घरी आणण्यात आला. त्यांच्यावर शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शिक्षकाला हलविले नागपूरला ट्रॅव्हल्समधून एकूण सात शिक्षक मेळघाटात कर्तव्यावर निघाले होते. यातील नारायण पुरी नामक शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. एका शिक्षकावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात, तर एका महिला शिक्षिकेवर अमरावतीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शिक्षिकेच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

पाच वर्षांची चिमुकली अन् आईचीही प्रकृती गंभीर गायत्री मावस्कर या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर आहे. तिला सुरुवातीला नागपूर रेफर करण्याचे सांगण्यात आले होते. या चिमुकलीसह तिची आई काली मावस्करही गंभीर जखमी आहे.

तीन महिन्यांपूर्वीही उलटली होती बस या मार्गावर सतत अपघात घडत असतो. विशेष म्हणजे, याच चावला कंपनीची बस तीन महिन्यांपूर्वी घटांग गावाजवळ वळणावर उलटली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात