शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

लालपरी धावली, मात्र प्रवाशाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

ठळक मुद्देमोर्शी आगारातून तीन बसफेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मार्च महिन्यापासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शुक्रवारी काही अटीवर सुरू करण्यात आल्या. परंतु प्रवासीच नसल्याने सकाळच्या सत्रात काही शेड्युल रद्द, तर एका फेरीविना प्रवास करावा लागल्याचा प्रसंग मोर्शी आगारावर ओढावला.लॉकडाऊनमुळे मार्चपासून बसेस बंद होत्या. राज्यात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २२ मे पासून पुन्हा बसेस सुरू करण्यात आल्यात. त्यानुसार मोर्शी आगारात सकाळी ७ वाजता ४ बसेस लावण्यात आल्या. परंतु ९ वाजेपर्यंत एकही प्रवासी आगारात न आल्याने यातील ३ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. एक फेरी ज्या रस्त्याने अधिक प्रवासी असतात आशा चांदूर बाजार - परतवाडा मार्गावरील रिद्धपूर या गावाकरिता सोडण्यात आली, परंतु, या बसमध्येसुद्धा एकही प्रवासी नसल्याचे दिसून आले. मोर्शी आगारातून नऊ शेड्यूल सोडण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकाने घेतला होता. त्यापैकी चार शेड्यूल सकाळच्या सत्रात व पाच शेड्यूल दुपारच्या सत्रात सोडण्यात येणार होत्या. परंतु पहिल्याच सत्रात तीन बसेस रद्द करण्यात आल्याने उर्वरित शेड्यूलसुद्धा पूर्णत्वास जाईल की नाही, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. नियमित वेळेत मोर्शी आगारातून २८३ फेड़्या केल्या जातात. परंतु लॉकडाऊनचा काळ पाहता मोर्शी आगारातून फक्त नऊ शेड्यूल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले. याकरिता पहाटे आगारात गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंग रहावे, याकरिता फक्त दहा कर्मचारी कर्तव्यावर बोलाविण्यात आले होते. आगारातून बस नेताना वाहकाकडे सॅनिटायझर व मास्क दिले जातात. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर एकच प्रवासी बसेल याची दक्षतासुद्धा घेण्याचे सांगितले आहे. बसमध्ये किमान २० प्रवासी असणे आवश्यक असून, ६५ वर्षांवरील नागरिक तसेच १० वर्षांच्या आतील मुलांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याने निवडक प्रवासी संख्या कमी राहिली.

टॅग्स :state transportएसटी