शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

भाईपूर शिवारातील शेतीचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देवरूड-मोर्शी महामार्ग : पावसाच्या पाण्याने नुकसान;कार्यकारी अभियंत्यांकडे भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : एच.जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने मोर्शी-वरूड मार्गातील सीमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे भाईपूर शिवारातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गोळा होऊन परिसर जलमय होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासंबंधी तक्रार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अमरावती येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुल ढोले यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेती जलमय झाली आहे.राहुल ढोले यांच्या शेतासमोर पाईपचा एक छोटा पूल कंपनीने तयार केला. मात्र या पुलाखालून पावसाचे पाणी जात नाही. तद्वतच आजूबाजूचे पाणी बाहेर निघायला मार्ग नसल्यामुळे ते पाणी पूर्णत: शेतात गोळा होते. याविषयीची तक्रार ढोले यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी ३१ जानेवारी व १२ फेब्रुवारी रोजी कंत्राटदार कंपनीला पत्र देऊन पाणी व्यवस्थापन योग्य न झाल्याचे कळविले.जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे यावर्षीच्या पावसाने दाखविले. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरून संपूर्ण पिके खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी बोगस बियाण्यांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, ते बियाणे उगवले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यानंतर जे बियाणे उगवले, त्यापासून होणारे उत्पादन समाधानकारक नसल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामध्येसुद्धा शेतकरी भरडला. आता पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे तिसºयांदा पेरणी करण्याचे वा जमीन नापेर ठेवण्याचे संकट परिसरातील शेतकºयांवर ओढवले आहे. याप्रकरणी कंत्राटदार कंपनीकडून शासनाने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकऱ्यांचे कुणी ऐकेल की नाही?शेतीमध्ये अपार कष्ट करून पीक पिकविले तेव्हाच वर्षभराची आर्थिक तरतूद करता येते. मात्र, भाईपूर शिवारातील शेतकºयांना दोन वर्षांपासून थातूरमातूर पिकवून गुजराण करावी लागत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी पेरावे आणि पावसाने जोर धरला की, तेच पीक पाण्याखाली सडत असल्याचे डोळ्यांदेखत पाहावे, यातील यातना प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, कंत्राटदार कंपनीपैकी कुणी ऐकेल की नाही, असा प्रश्न पाण्याखाली शेती गेलेल्या शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर