शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

भाईपूर शिवारातील शेतीचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देवरूड-मोर्शी महामार्ग : पावसाच्या पाण्याने नुकसान;कार्यकारी अभियंत्यांकडे भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : एच.जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने मोर्शी-वरूड मार्गातील सीमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे भाईपूर शिवारातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गोळा होऊन परिसर जलमय होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासंबंधी तक्रार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अमरावती येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुल ढोले यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेती जलमय झाली आहे.राहुल ढोले यांच्या शेतासमोर पाईपचा एक छोटा पूल कंपनीने तयार केला. मात्र या पुलाखालून पावसाचे पाणी जात नाही. तद्वतच आजूबाजूचे पाणी बाहेर निघायला मार्ग नसल्यामुळे ते पाणी पूर्णत: शेतात गोळा होते. याविषयीची तक्रार ढोले यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी ३१ जानेवारी व १२ फेब्रुवारी रोजी कंत्राटदार कंपनीला पत्र देऊन पाणी व्यवस्थापन योग्य न झाल्याचे कळविले.जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे यावर्षीच्या पावसाने दाखविले. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरून संपूर्ण पिके खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी बोगस बियाण्यांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, ते बियाणे उगवले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यानंतर जे बियाणे उगवले, त्यापासून होणारे उत्पादन समाधानकारक नसल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामध्येसुद्धा शेतकरी भरडला. आता पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे तिसºयांदा पेरणी करण्याचे वा जमीन नापेर ठेवण्याचे संकट परिसरातील शेतकºयांवर ओढवले आहे. याप्रकरणी कंत्राटदार कंपनीकडून शासनाने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकऱ्यांचे कुणी ऐकेल की नाही?शेतीमध्ये अपार कष्ट करून पीक पिकविले तेव्हाच वर्षभराची आर्थिक तरतूद करता येते. मात्र, भाईपूर शिवारातील शेतकºयांना दोन वर्षांपासून थातूरमातूर पिकवून गुजराण करावी लागत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी पेरावे आणि पावसाने जोर धरला की, तेच पीक पाण्याखाली सडत असल्याचे डोळ्यांदेखत पाहावे, यातील यातना प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, कंत्राटदार कंपनीपैकी कुणी ऐकेल की नाही, असा प्रश्न पाण्याखाली शेती गेलेल्या शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर