शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

५५ एकरात साकारणार कौंडण्यपूर पर्यटन स्थळ

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

वर्धा नदीच्या तिरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले रुक्मिणी मातेचे माहेर कौंडण्यपूर सर्वदूर परिचित आहे.

यशोमती ठाकू र यांची स्वप्नपूर्ती : देवी रूख्मिणीच्या माहेरचा चेहरा-मोहरा पालटणारअमरावती : वर्धा नदीच्या तिरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले रुक्मिणी मातेचे माहेर कौंडण्यपूर सर्वदूर परिचित आहे. या गावाला ऐतिहासिक परंपरा, प्राचीन महत्त्व असताना ते विकासापासून दूर राहिले. मात्र, पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूरचा विकास व्हावा, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी कमालीची धडपड चालविली आहे. ५५ एकर परिसरात पालखी रिंगण सोहळा, देखणे पर्यटनस्थळ, भव्यदिव्य प्रवेशद्वार, बालउद्यान, रिसोर्ट, भक्तनिवास, पार्किंग, बोटिंग, तीन घाटांची निर्मिती, विठ्ठल- रुक्मिणीचे स्टॅच्यू, रस्यांचे जाळे विणताना कौंडण्यपूरचे रुपडं पालटणार आहे. विकास म्हणजे चार भिंती नव्हे तर पुढील ५० वर्षांचे नियोजन कसे असावे, ही संकल्पना आ. यशोमती ठाकूर यांनी कौंडण्यपूर विकास आराखड्यातून सिद्ध केले. ‘टुरिझम डेव्हलपमेंट’ या संकल्पनेवर आधारित कौंडण्यपूर विकासाची पायाभरणी करण्यात आली. पंढरपूर ते कौंडण्यपूर ही दोन पौराणीक स्थळे एकमेकांशी जोडण्यासाठी आ. ठाकूर यांनी स्वप्नपूर्तीकडे वाटचाल चालविली आहे. कौंडण्यपूर विकास आराखड्यासाठी १३ कोटी ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याच विकास आराखड्यांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग २० कोटींतून अंतर्गत व बाह्य रस्ते, पूल, विश्रामगृह आदी विकासकामे विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात करीत आहेत. राज्य शासनाने पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूरचा विकास करावा, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनस्तरावर केलेले प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे माजी आ. भय्यासाहेब ठाकूर यांनी कौंडण्यपूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना त्यांनी सुचविलेल्या नावीण्यपूर्ण संकल्पना, विकास कामांना या आराखड्यात स्थान देण्यात आले आहे. विश्वास मढाऊ हे कौंडण्यपूर विकास आराखड्याचे वास्तुशिल्पकार आहेत. मढाऊ यांनीच शेगाव येथील आनंद सागर ही भव्यदिव्य वास्तू साकारण्याची किमया केली आहे. परंतु वर्धा नदीच्या तिरावर वसलेले कौंडण्यपूर हे भविष्यात विदर्भात सर्वात देखणे आणि मोठे पर्यटनस्थळ नावारुपास येईल, अशी पायाभरणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. पंढरपूरच्या धर्तीवर कौंडण्यपूर येथे ४ हजार मीटर पालखी रिंगण सोहळ्याचे मैदान, भव्यदिव्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, पार्किंग, पर्यटकांसाठी विसावा, उद्यान, बैठक व्यवस्था, रिसोर्ट, भक्तनिवास आणि नदीच्या तिरावर तयार करण्यात आलेले घाट हे येत्या काळात भक्तांसाठी पर्वणी ठरेल. पंढरपूरच्या धर्तीवर रुख्मिणीच्या माहेरी कौंडण्यपूर येथे मोठा आषाढी उत्सव साजरा करण्याचे मानस आ. यशोमती ठाकूर यांचे आहे. जिल्ह्यातून नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून रुक्मिणी मातेच्या पालखीला मान राहणार आहे. त्याअनुषंगाने विकास आराखड्यात विविध कामे आ. यशोमती ठाकूर, माजी आ. भय्यासाहेब ठाकूर यांनी सुचविली आहेत. (प्रतिनिधी)