शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

-तर किचनची जप्ती

By admin | Updated: October 22, 2016 00:10 IST

घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या हॉटेलवर कारवईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

मनपाचा इशारा : बायोगॅस प्रकल्प उभारणी आवश्यकअमरावती : घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या हॉटेलवर कारवईचा बडगा उगारण्यात येणार आहे. बायोगॅस आणि तत्सम प्रकल्प उभारणीला खो देणाऱ्या हॉटेल्स तथा मंगल कार्यालयाच्या किचनला सिल करण्यात येणार आहे. आगामी आठवड्यातही कारवाई केली जाणार असल्याचे यंत्रणेला म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात अंदाजे ५३० हॉटेल, मंगल कार्यालये, खानावळी व इतर आस्थापना आहेत. ८ एप्रिल २०१६ रोजी पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार त्या आस्थापनेतून निघालेल्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधिताची आहे. या सर्व आस्थापनेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून सुका कचरा मनपा नियुक्त कचरा वेचकाला देण्याबाबत किंवा त्यांच्यामार्फत विल्हेवाट लावण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. ओल्या कचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले.महापालिका आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वात पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्या अधिनस्थ यंत्रणेने संबंधित आस्थापना धारकांना नोटीस जारी केल्यात. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्या अनुषंगाने ओल्या कचऱ्याकरिता खत किंवा बायोगॅस प्रकल्प त्वरित बसविण्यासंदर्भात दोन वेळा नोटीसेस देण्यात आल्या. तथापि त्यानंतरही खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या आस्थापनेमधील ‘किचन’ महापालिकेतर्फे सील करण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी अतिरिक्त आयुक्तांनी हॉटेल, खाणावळीधारकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची आवश्यकता पटवून सांगितली. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)खत किंवा बायोगॅस प्रकल्प न उभारणाऱ्या हॉटेल, खानावळी आणि मंगल कार्यालयातील ‘किचन’ सील करण्यात येतील. कारवाईला पुढील आठवड्यात प्रारंभ होईल. - सोमनाथ शेटे, अतिरिक्त आयुक्त, मनपा.