शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

-तर किचनची जप्ती

By admin | Updated: October 22, 2016 00:10 IST

घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या हॉटेलवर कारवईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

मनपाचा इशारा : बायोगॅस प्रकल्प उभारणी आवश्यकअमरावती : घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या हॉटेलवर कारवईचा बडगा उगारण्यात येणार आहे. बायोगॅस आणि तत्सम प्रकल्प उभारणीला खो देणाऱ्या हॉटेल्स तथा मंगल कार्यालयाच्या किचनला सिल करण्यात येणार आहे. आगामी आठवड्यातही कारवाई केली जाणार असल्याचे यंत्रणेला म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात अंदाजे ५३० हॉटेल, मंगल कार्यालये, खानावळी व इतर आस्थापना आहेत. ८ एप्रिल २०१६ रोजी पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार त्या आस्थापनेतून निघालेल्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधिताची आहे. या सर्व आस्थापनेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून सुका कचरा मनपा नियुक्त कचरा वेचकाला देण्याबाबत किंवा त्यांच्यामार्फत विल्हेवाट लावण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. ओल्या कचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले.महापालिका आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वात पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्या अधिनस्थ यंत्रणेने संबंधित आस्थापना धारकांना नोटीस जारी केल्यात. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्या अनुषंगाने ओल्या कचऱ्याकरिता खत किंवा बायोगॅस प्रकल्प त्वरित बसविण्यासंदर्भात दोन वेळा नोटीसेस देण्यात आल्या. तथापि त्यानंतरही खत किंवा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या आस्थापनेमधील ‘किचन’ महापालिकेतर्फे सील करण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी अतिरिक्त आयुक्तांनी हॉटेल, खाणावळीधारकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची आवश्यकता पटवून सांगितली. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)खत किंवा बायोगॅस प्रकल्प न उभारणाऱ्या हॉटेल, खानावळी आणि मंगल कार्यालयातील ‘किचन’ सील करण्यात येतील. कारवाईला पुढील आठवड्यात प्रारंभ होईल. - सोमनाथ शेटे, अतिरिक्त आयुक्त, मनपा.