शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

लग्नाचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी युवतीचे वाहनातून अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST

अमरावती: ओळखीतील युवतीने लग्नाचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यासाठी एका विवाहित पुरुषाने तिचे वाहनातून अपहरण केले. त्यानंतर ...

अमरावती: ओळखीतील युवतीने लग्नाचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यासाठी एका विवाहित पुरुषाने तिचे वाहनातून अपहरण केले. त्यानंतर एका धाब्यावर नेऊन चाकूचा धाक दाखवून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी शहरात घडली.

पोलीस सूत्रांनुसार, सुशील देविदास मेश्राम (३५, रा. दत्तात्रयनगर, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी युवती व आरोपी हे एकमेकांचे परिचित असून, त्यांचे फोनवर मागील दोन वर्षापासून बोलणे सुरू होते. परंतु सद इसम विवाहित व एका मुलाचा बाप असल्याचे युवतीला समजले. दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. त्यामुळे चिडलेल्या सुशीलने ती राहत असलेल्या होस्टेलवर चार वेळा येऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझ्याशी बोल, असे सांगितले.

लग्नाला होकार न दिल्याने सुशीलने होस्टेलवर येऊन तिला शिवीगाळ केली तसेच जबरीने चारचाकी वाहनात डांबले. चाकूच्या धाकावर तिला चांदूर रेल्वे मार्गे देवगाव येथील धाब्यावर नेले. येथे त्याने दोघांनाही संपविण्याची धमकी दिली. यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास अमरावतीला आणून सोडले, अशी तक्रार सदर युवतीने नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५२, ३५४ (ड), ३६३, ३४२, २९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास ........................ पोलीस करीत आहेत.