शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अपहरण प्रकरण, सहा आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST

अमरावती : चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींचा पीसीआर (पोलीस कोठडी) २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात ...

अमरावती : चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींचा पीसीआर (पोलीस कोठडी) २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. मात्र, या प्रकरणात आणखी महत्त्वाचा उलगडा होणे गरजेचे असल्याने राजापेठ पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर करून आरोपीविरुद्ध पोलिसांनी गोळा केलेले सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले. तसेच या गुन्ह्यात आरोपींकडून आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने हे ग्राहय धरून आरोपींना पुन्हा सहा मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला.

अटक केलेल्या सातवी आरोपी रुखसार शेखला १ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला. ६ मार्चपर्यंत पीसीआर मिळालेल्या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकी कोठला अहमदनगर), अल्मश ताहीर शेख (१८, रा. कोठला अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला अहमदनगर), फैरोज रशिद शेख (२५, रा. कोठला अहमदनगर), मोनिका जसवंतराय लुणीया(४७, रा. शारदानगर अमरावती) यांचा समावेश आहे.

बॉक्स

दोन आरोपी अद्यापही पसारच

या घटनेतील मास्टरमाईंड इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जू अजीज हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहे. दोन्ही आरोपी मुंबईत पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, जोपर्यंत ते हाती लागत नाही तोपर्यंत घटनेचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. आरोपी हाती लागल्यानंतर आणखी किती आरोपींचा यात सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.

बॉक्स:

गुन्ह्यात वापरलेले मोबाईल होणार जप्त?

अटकेतील आरोपींकडून पाच कोटींच्या खंडणीसाठी दादीच्याच सांगण्यावरून अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मात्र, गुन्ह्यात वापलेले चार ते पाच मोबाईल अद्याप जप्त केले नाही. पोलीस सदर मोबाईल जप्त करणार असून, याप्रकरणी दोन कार व दुचाकी जप्त केलेल्या आहेत.

कोट

आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयासमोर ठेवले. यात आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. ते न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना ६ मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला आहे.

- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापेठ