शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:44 IST

यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

ठळक मुद्देसोयाबीनला सर्वाधिक मागणी : महाबीजचे ६६ हजार क्विंटल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरक्षेत्र प्रस्तावित आहेत. यासाठी खते-बियांण्यांचे नियोजन कृषी विभागाद्वारा सुरू आह. गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्रवाढ होत असल्याने बियाण्यांची मागणीदेखील वाढणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १.१७ लाख क्विंटल, २०१६ मध्ये १.४३ लाख क्विंटल, २०१७ मध्ये १.३१ लाख क्विंटल बियाणे लागले होते. यंदांच्या हंगामात क्षेत्रवाढीची शक्यता असल्याने किमान १.५१ लाख क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३ हजार ४९४ क्विंटल, भातकुली १२ हजार ६९५, नांदगाव खंडेश्वर १८ हजार १९७, चांदूर रेल्वे १२ हजार ७९६, तिवसा १० हजार ७६३, धामणगाव रेल्वे १० हजार ७१३, मोर्शी १० हजार ७८१, वरूड ९ हजार ४४७, अंंजनगाव सुर्जी १० हजार १४४, अचलपूर ८ हजार ७२८, दर्यापूर ८ हजार ६३५, चांदूर बाजार १० हजार ८५१, धारणी ७ हजार २९० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६२५ क्विंटल असे एकूण १ लाख ५० हजार २९ क्विंटल बियाण्यांची गरज आहे.यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्यामुळे सर्वाधिक १,३२,५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. संकरित कापूस ४,१६३ क्विंटल, सुधारित ६०० क्विंटल, तूर ६२४० क्विंटल, मूग १३८६ क्विंटल, संकरित ज्वार २,८०० क्विंटल, तर उडदाचे २३४० क्विंटल बियाणे लागणार आहे.बीटीच्या ९.२५ लाख पाकिटांची मागणीमागील हंगामात सर्वच कंपनीच्या वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा विशिष्ट अशा कंपनीच्या वाणाची मागणी नाही. यंदा अमरावती तालुक्यात ४०६०० पाकिटे, भातकुली ३६०००, नांदगाव खंडेश्वर २२५००, चांदूर रेल्वे ३६१००, तिवसा ६७६००, धामणगाव रेल्वे १११५००, मोर्शी १०८५००, वरूड १३३०००, अंजनगाव सुर्जी ६७५००, अचलपूर ८४०००, दर्यापूर ८२०००, चांदूर बाजार ९५०००, धारणी ३६१००, चिखलदरा तालुक्यात ४६०० पाकिटांची आवश्यकता आहे.यंदा १.०६ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची गरजयंदाच्या हंगामात १,०६,८२० मे. टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक युरिया ३४,१०० मे.टन, डीएपी १८,६६०, एमओपी ७,९६० मे. टन लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,५४६ मे.टन, भातकुली ५,८७५, नांदगाव खंडेश्वर ४,८०७, चांदूररेल्वे ५,३४१, धामणगाव रेल्वे ६,९४३, तिवसा ७,४७७, मोर्शी १०,६८२, वरूड १२,८९८, चांदूर बाजार ८,०१२, अचलपूर ११,२१६, ांजनगाव सुर्जी ९,०८०, दर्यापूर ९,६१४, धारणी ५,३४१ व चिखलदरा तालुक्यात १,०६८ मे.टन रासायनिक खतांची गरज आहे.