शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:44 IST

यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

ठळक मुद्देसोयाबीनला सर्वाधिक मागणी : महाबीजचे ६६ हजार क्विंटल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरक्षेत्र प्रस्तावित आहेत. यासाठी खते-बियांण्यांचे नियोजन कृषी विभागाद्वारा सुरू आह. गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्रवाढ होत असल्याने बियाण्यांची मागणीदेखील वाढणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १.१७ लाख क्विंटल, २०१६ मध्ये १.४३ लाख क्विंटल, २०१७ मध्ये १.३१ लाख क्विंटल बियाणे लागले होते. यंदांच्या हंगामात क्षेत्रवाढीची शक्यता असल्याने किमान १.५१ लाख क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३ हजार ४९४ क्विंटल, भातकुली १२ हजार ६९५, नांदगाव खंडेश्वर १८ हजार १९७, चांदूर रेल्वे १२ हजार ७९६, तिवसा १० हजार ७६३, धामणगाव रेल्वे १० हजार ७१३, मोर्शी १० हजार ७८१, वरूड ९ हजार ४४७, अंंजनगाव सुर्जी १० हजार १४४, अचलपूर ८ हजार ७२८, दर्यापूर ८ हजार ६३५, चांदूर बाजार १० हजार ८५१, धारणी ७ हजार २९० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६२५ क्विंटल असे एकूण १ लाख ५० हजार २९ क्विंटल बियाण्यांची गरज आहे.यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्यामुळे सर्वाधिक १,३२,५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. संकरित कापूस ४,१६३ क्विंटल, सुधारित ६०० क्विंटल, तूर ६२४० क्विंटल, मूग १३८६ क्विंटल, संकरित ज्वार २,८०० क्विंटल, तर उडदाचे २३४० क्विंटल बियाणे लागणार आहे.बीटीच्या ९.२५ लाख पाकिटांची मागणीमागील हंगामात सर्वच कंपनीच्या वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा विशिष्ट अशा कंपनीच्या वाणाची मागणी नाही. यंदा अमरावती तालुक्यात ४०६०० पाकिटे, भातकुली ३६०००, नांदगाव खंडेश्वर २२५००, चांदूर रेल्वे ३६१००, तिवसा ६७६००, धामणगाव रेल्वे १११५००, मोर्शी १०८५००, वरूड १३३०००, अंजनगाव सुर्जी ६७५००, अचलपूर ८४०००, दर्यापूर ८२०००, चांदूर बाजार ९५०००, धारणी ३६१००, चिखलदरा तालुक्यात ४६०० पाकिटांची आवश्यकता आहे.यंदा १.०६ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची गरजयंदाच्या हंगामात १,०६,८२० मे. टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक युरिया ३४,१०० मे.टन, डीएपी १८,६६०, एमओपी ७,९६० मे. टन लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,५४६ मे.टन, भातकुली ५,८७५, नांदगाव खंडेश्वर ४,८०७, चांदूररेल्वे ५,३४१, धामणगाव रेल्वे ६,९४३, तिवसा ७,४७७, मोर्शी १०,६८२, वरूड १२,८९८, चांदूर बाजार ८,०१२, अचलपूर ११,२१६, ांजनगाव सुर्जी ९,०८०, दर्यापूर ९,६१४, धारणी ५,३४१ व चिखलदरा तालुक्यात १,०६८ मे.टन रासायनिक खतांची गरज आहे.