शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

६ लाख ९४ हजार हेक्टरवर स्थिरावला खरीपहंगाम

By admin | Updated: July 31, 2016 00:06 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी सरासरी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २८ जुलै अखेर ६ लाख ९४ हजार ६०४ हेक्टर मध्ये पेरणी आटोपली,

९५.४ टक्के पेरणी : २,८४,८०१ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्रप्रभाकर भगोले चांदूररेल्वेयंदाच्या खरीप हंगामासाठी सरासरी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २८ जुलै अखेर ६ लाख ९४ हजार ६०४ हेक्टर मध्ये पेरणी आटोपली, याची ९५.४ टक्केवारी आहे. संततधार पावसामुळे मात्र काही भागातील पिके पिवळी पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात २० जूनला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर खरीपांच्या पेरणीला वेग आला. महिनाभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणी आटोपल्या आहे. सद्यस्थितीत चांदूर रेल्वे तालुक्यात ३९ हजार ४४९ हेक्टर मध्ये पेरणी झाली. ही ९२.५ टक्के आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४२ हजार ४९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. ही ९३.४ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ४२ हजार ९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८७ टक्के आहे. चांदूरबाजार तालुक्यात ५० हजार ३२६ हेक्टरमध्ये पेरणी झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यात ५३ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली, याची ९६.६ टक्केवारी आहे. तिवसा तालुक्यात ४३ हजार ७८ हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९४.८ टक्केवारी आहे. मोर्शी तालुक्यात ५९ हजार ७३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली याची ९४ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ४७ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली याची ९७.८ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक ७२ हजार ७४१ क्षेत्रात पेरणी झाली ही १०३ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात ४७ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालीही १०२ टक्के आहे. चिखलदरा तालुक्यात २३ हजार २९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून याची टक्केवारी ९२ एवढी आहे. अमरावती तालुक्यात ५६ हेक्टर ४७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली ९७.७ ही १०१ टक्केवारी आहे, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६६ हजार ४७ हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी आटोपली ही ९७.५ टक्केवारी आहे. नादगांव तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना २ लाख ८४ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. याची ८८.१ एवढी टक्केवारी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने यावर्षी सर्वाधिक ५० हजार २७८ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. याची टक्केवारी ११८ एवढी आहे, तर सर्वात कमी २६ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर वरुड तालुक्यात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. याची टक्केवारी १८ आहे.वरुड तालुक्यात सर्वाधिक कपाशीजिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी कपाशीचे १ लाख ९३ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत २८ जुलैपर्यंत १ लाख ७९ हजार २३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. ही ९२.७ टक्केवारी आहे. सर्वाधिक २६ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. येथे सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक व ११८ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. सर्वात कमी ७३१ हेक्टर क्षेत्रावर चिखलदऱ्यात पेरणी करण्यात आली आहे.