शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

यंदा ३०.९१ लाख हेक्टरमध्यरे खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

अमरावती : पावसाअभावी माघारलेल्या खरिपाच्या पेरण्या मान्सून सक्रिय होताच पूर्णत्वाला गेल्या आहेत. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३० लाख ६१ हजार ...

अमरावती : पावसाअभावी माघारलेल्या खरिपाच्या पेरण्या मान्सून सक्रिय होताच पूर्णत्वाला गेल्या आहेत. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३० लाख ६१ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. ही ९५ टक्केवारी आहे. यामध्ये काही प्रमाणात अकोला जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

यंदाच्या खरिपाकरिता अमरावती विभागात ३२,२८,५०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ३०,६१,४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपलेली आहे. अकोला जिल्हा वगळता उर्वरित चारही जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९५ टक्के प्रमाणात पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्यात सुरुवातीला पावसाची उसंत असल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, ९ जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्याने अमरावती विभागात सध्या ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ७,०४,८०० हेक्टर (९६ टक्के), अकोला जिल्ह्यात ४,१७,५०० हेक्टर (८५ टक्के), वाशिम ३,९३,००० हेक्टर (९७ टक्के), अमरावती जिल्ह्यात ६,७७,४०० (९८ टक्के) व यवतमाळ जिल्ह्यात ८,६८,६०० हेक्टर ( ९५ टक्के) क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहे.

बॉक्स

पीकनिहाय क्षेत्र

पश्चिम विदर्भात सोयाबीन १४,१४,९०० हेक्टर, कपाशी ९,९१,९००, तूर ४,११,७०० हेक्टर, मुग ६३,४०० हेक्टर, उडीद ४७,८०० हेक्टर, मका ३७,६०० हेक्टर, धान ५,६००, बाजरी ३५,६०० हेक्टर, भुईमूग ९०० हेक्टर, तीळ १,१०० हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. आतापर्यत४६०.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही अपेक्षित पावसाचे ११६ टक्के आहे. अमरावती वगळता चारही जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे.