शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

खरीप हंगामाचे हमीभाव गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

सरकारकडून हमीभावाने शेतमालाची खरेदी होत असते. यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असतानाही केंद्र सरकारने हमीभाव जाहीर न ...

सरकारकडून हमीभावाने शेतमालाची खरेदी होत असते. यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असतानाही केंद्र सरकारने हमीभाव जाहीर न केल्यामुळे सरकारच्या हेतूबद्दलच शंका घेतली जात आहे. देशभरातील कृषी विद्यापीठे शेतमालाच्या आधारभूत किमतीचा अहवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला पाठवतात व यावर आधारित शेतमालाच्या दरवाढीच्या शिफारशी कृषिमूल्य आयोग शासनाला करते. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जातो. सर्वसाधारणपणे मे महिन्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होते. केरळात मान्सून दाखल होण्याअगोदर शासनाच्यावतीने खरीप हंगामासाठीचे हमीभाव जाहीर होतात. मात्र, यावर्षी अद्यापही हे भाव जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

कापूस, तूर, सोयाबीन, मका या पिकांसाठी जी रासायनिक खते घालावी लागतात, त्याचा ३० रुपये किलो दर आहे. मजुरी, कीटकनाशकांच्या किमती, बियाणांचा दर, खाद्य तेल, डाळी, किराणाचे दर सर्वच गगनाला भिडले आहेत. सामान्य शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. पेरणीच्या तोंडावर डाळीच्या आयातीवरील निर्बंध उठवल्याने डाळवर्गीय पिकांचे भाव पडले. नवीन हमीभाव जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे डाळवर्गीय पिके घ्यायची की नाही, याबद्दल शेतकरी वर्गात संभ्रम आहे.