शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

खरीप उद्ध्वस्त; सुधारित पैसेवारी ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरला नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : जिल्ह्यात बाधित दीड लाख हेक्टरचे पंचनामे सुरु असताना महसूलचा कुटाराघात

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबरचे दरम्यान अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या दीड लाख हेक्टरमधील पिकांचे सर्वेक्षण अन् पंचनामे सुरू असतानाच खरिपाची सुधारित ६२ पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा ठरला आहे. महसूल यंत्रणेला वास्तवाचे भान नाही काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरला नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर केली. यामध्ये सुधारणेला वाव आहे, असे सांगत ३१ ऑक्टोबरला १९६१ गावांतील सुधारित ६२ पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसाने व अवकाळी पावसाने उद्वस्त होऊनही महसूल यंत्रणेद्वारा, पैसेवारीत शेतकºयांची थट्टा आरंभली आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवाती पावसात खंड राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यांपासून आलेल्या पावसाने जिल्ह्याची सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरीत उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आली आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आॅलवेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात असताना ५७ पैसेवारी जाहीर केली आहे. अमरावती तालुक्यात ६२, तिवसा ६३, चांदूर रेल्वे ५८, धामणगाव रेल्वे ६३, नांदगाव खंडेश्वर ५९, मोर्शी ६८, वरूड ७१, अचलपूर ६२, चांदूरबाजार ५९, दर्यापूर ६०, अंजनगाव सुर्जी ६९, धारणी ६० व चिखलदरा तालुक्यात ५४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चदेखील निघणे मुस्किल असताना अंतिम पैसेवारीत तरी जिल्ह्याचे वास्तववादी चित्रण होणार काय, असा सवाल बळीराजाचा आहे.महसूल यंत्रणेद्वारा शेतकऱ्यांचा विश्वासघातजिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यानच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरमधील खरिपाची पिके ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. ५ नोव्हेंबरच्या आत संयुक्त पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कृषी व महसूल यंत्रणा ३० ऑक्टोबरपासून शिवारात डेरेदाखल झाली. युद्धस्तरावर प्रक्रिया होत असताना हीच महसूल यंत्रणा ३१ ऑक्टोबरला ६२ पैसेवारी दाखवितेच कशी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यामध्ये शेतकºयांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :agricultureशेती