शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

निवडणुकीत नुसताच मान, धन केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन तीन महिन्यांचा कालावधी झालेला असताना १.६६ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन तीन महिन्यांचा कालावधी झालेला असताना १.६६ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाने सातत्याने मागणी करूनही या विभागाला अद्याप जाग आलेली नाही. किमान सात हजार कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामुळे निवडणुकीतील कर्तव्यावर फक्त ‘मान’ मिळाला. धन कधी मिळणार, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. याकरिता किमान १० हजार कर्मचारी मनुष्यबळ लागले. ग्रामीण दुर्गंम भागातील मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य निभावले. केवळ मतदानच नाही तर मतमोजणी केंद्रांवरदेखील या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. कोरोना काळात या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले आहे.

यापूर्वी निवडणूक पार पडल्यानंतर त्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन दिले जायचे. मात्र, अलीकडे निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाकडून अपुरा निधी प्राप्त होत असल्यामुळे आवश्यक ती कामे केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे मानधन मात्र, प्रलंबित ठेवल्या जात आहे. केलेल्या कामाचा मोबदला जर मिळत नसेल तर उपयोग काय, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.

बाॅक्स

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व मनुष्यबळ

तालुका ग्रामपंचायती मनुष्यबळ

अमरावती ४४ ८००

भातकुली ३५ ५२४

नांदगाव खं ४७ ६८०

तिवसा २८ ५२०

चांदूर रेल्वे २८ ४४०

धामणगाव ५३ ६०६

दर्यापूर ५० ८००

अंजनगाव ३४ ५५६

अचलपूर ४३ ३८०

चांदूर बाजार ४० ८२५

मोर्शी ३७ ६७२

वरूड ४१ ७३६

धारणी ३५ ५५२

चिखलदरा २३ ३०४

एकूण ५३७ ६,३९१

पाईंटर

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : ५५३

कर्तव्य बजावलेले अधिकारी : ४,४५४

कर्तव्य बजावलेले कर्मचारी : ४,७२१

बॉक्स

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींकरिता प्रति ग्रामपंचायत ५० हजार रुपये याप्रमाणे अनुदान ग्रामविकास विभागाकडून देण्यात येते. जिल्ह्यात १,६१,४७,६०० रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यात निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतींना २९,२०० याप्रमाणे निधी देण्यात आलेला आहे. अद्यापही २०,८०० रुपयांप्रमाणे १,१५,०२,४०० रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. याशिवाय जिल्हास्तरावर अधिकारी व कर्मचारी यांचे मानधनाचे २ लाख व शासकीय मुद्रणालयाचे ३०,५८,८८१ देयके प्रलंबित आहेत. असे एकूण १,६६,०१,०८१ रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.