शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत नुसताच मान, धन केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन तीन महिन्यांचा कालावधी झालेला असताना १.६६ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन तीन महिन्यांचा कालावधी झालेला असताना १.६६ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्हा प्रशासनाने सातत्याने मागणी करूनही या विभागाला अद्याप जाग आलेली नाही. किमान सात हजार कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामुळे निवडणुकीतील कर्तव्यावर फक्त ‘मान’ मिळाला. धन कधी मिळणार, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. याकरिता किमान १० हजार कर्मचारी मनुष्यबळ लागले. ग्रामीण दुर्गंम भागातील मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य निभावले. केवळ मतदानच नाही तर मतमोजणी केंद्रांवरदेखील या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. कोरोना काळात या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले आहे.

यापूर्वी निवडणूक पार पडल्यानंतर त्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन दिले जायचे. मात्र, अलीकडे निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाकडून अपुरा निधी प्राप्त होत असल्यामुळे आवश्यक ती कामे केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे मानधन मात्र, प्रलंबित ठेवल्या जात आहे. केलेल्या कामाचा मोबदला जर मिळत नसेल तर उपयोग काय, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.

बाॅक्स

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व मनुष्यबळ

तालुका ग्रामपंचायती मनुष्यबळ

अमरावती ४४ ८००

भातकुली ३५ ५२४

नांदगाव खं ४७ ६८०

तिवसा २८ ५२०

चांदूर रेल्वे २८ ४४०

धामणगाव ५३ ६०६

दर्यापूर ५० ८००

अंजनगाव ३४ ५५६

अचलपूर ४३ ३८०

चांदूर बाजार ४० ८२५

मोर्शी ३७ ६७२

वरूड ४१ ७३६

धारणी ३५ ५५२

चिखलदरा २३ ३०४

एकूण ५३७ ६,३९१

पाईंटर

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : ५५३

कर्तव्य बजावलेले अधिकारी : ४,४५४

कर्तव्य बजावलेले कर्मचारी : ४,७२१

बॉक्स

जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींकरिता प्रति ग्रामपंचायत ५० हजार रुपये याप्रमाणे अनुदान ग्रामविकास विभागाकडून देण्यात येते. जिल्ह्यात १,६१,४७,६०० रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यात निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतींना २९,२०० याप्रमाणे निधी देण्यात आलेला आहे. अद्यापही २०,८०० रुपयांप्रमाणे १,१५,०२,४०० रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. याशिवाय जिल्हास्तरावर अधिकारी व कर्मचारी यांचे मानधनाचे २ लाख व शासकीय मुद्रणालयाचे ३०,५८,८८१ देयके प्रलंबित आहेत. असे एकूण १,६६,०१,०८१ रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.