शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तिवसा मतदारसंघातील ...

ठळक मुद्देकाँग्रेसची जिल्हा कचेरीवर धडक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी मंगळवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तिवसा मतदारसंघातील भातकुली, अमरावती व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील पिकांकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम भरलेली असतानाही ५ वर्षांचे उत्पन्न आधारित उंबरठा उत्पन्नामुळे वरील तालुक्यातील महसूल मंडळे वगळल्यामुळे विमा रक्कम मिळाली नाही. तालुकानिहाय वगळलेल्या मंडळामध्ये भातकुली तालुक्यातील : आष्टी, खोलापूर, पूर्णानगर, तिवसातील कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा, तिवसा, वरखेड, अमरावती तालुक्यातील डवरगाव, माहुली, जहागीर, शिराळा, वलगाव, मोर्शीतील नेरपिंगळाई, शिरखेड, धामणगावचा समावेश आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांनी पीकनिहाय रक्कम भरूनही विमा लागू झाला नाही. आणेवारी ५० पैशाचे आत असल्याने महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना पिकाच्या विमा कंपनीकडून विम्याची योग्य रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. यावेळी झेडपी सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, शेखर औगड, दिलीप म्हस्के, अभिजित बोके, वैभव वानखडे, वीरेंद्रसिंह जाधव, प्रकाश माहोरे, दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.