शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

खरीप उद्ध्वस्त संयुक्त सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:41 IST

यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून अवकाळी : १.४५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे १ लाख ४७ हजार ९१९ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन जागेवरच थिजले. ज्यांनी सोंगणी केली, त्यांनी लावलेल्या गंजीमधील शेंगांना अंकुर फुटत आहेत. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रथवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.जिल्हा कृषी विभागाद्वारे प्राथमिक नजरअंदाज अहवाल २९ ऑक्टोबरला जिल्हाधिकाºयांना सादर झाला. यामध्ये जिल्ह्यातील १६०६ गावांमध्ये सोयाबीन ९५ हजार ८९९ हेक्टर, कापूस ४१ हजार, ज्वारी ३१६३ हेक्टर, धान ३४६९ हेक्टर, तूर ७२० हेक्टर व १८३ हेक्टरमधील मका पिकाचे मोठे नुकसान या पावसाने झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरीप पिकांना फटका बसलेला आहे. किमान १ लाख ४७ हजार ९२९ शेतकरी या अकाली संकटामुळे बाधित झालेले आहेत.३३ टक्क्यांवर नुकसानाचे सर्वेक्षणदहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. ग्रामसेवक, कृषिसहायक व तलाठी संयुक्त सर्वेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करणार आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या, कापणीस आलेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीसह तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.७२ तासांच्या आत करा अर्जजिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी काढणीच्या अवस्थेत आहेत. कपाशीची बोंडे परिपक्व झाल्याने फुटू लागली आहेत. ती आता सडायला लागली आहेत. कापून सुकत ठेवलेले सोयाबीनदेखील ओले झाले आहे. पावसाने अवेळी हे नुकसान झाले आहे. पीक विमा क्षेत्र जलमय होणे व कापणी केलेल्या पिकांचे काढणीपश्चात नुकसान या बाबींसाठी वैयक्तिक पंचनामे करुन विमादारक शेतकºयांना भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यासाठी पिक नुकसानीचा सुचना फार्म भरुन लगतच्या कृषी कार्यालयाकडे देणे महत्वाचे आहे.टोल फ्री क्रमांकावर द्यावी माहितीपिकांच्या नुकसानाची माहिती १८००११६५१५ या टोल फ्री क्रमांकावर देणे आवश्यक आहे. पावसामुळे शेती जलमय होऊन उभ्या पिकांचे किंवा कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास ७/१२ व विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनी, तालुका, जिल्हा कार्यालय, विमा हप्ता भरलेली बँक, महसूल वा कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाºयांकडे कळविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी