शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

काँग्रेस पक्षासाठी एकजूट व्हा !

By admin | Updated: June 27, 2016 00:03 IST

येणाऱ्या जि. प., पं. स., न. पा. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असून...

जिल्हा काँग्रेसची बैठक : माजी मंत्री सुबोध मोहिते यांचे आवाहन अमरावती : येणाऱ्या जि. प., पं. स., न. पा. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्कल, तालुकानिहाय मास्टर प्लॉन तयार करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे, त्याकरिता सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटन मजबूत करावे. उमेदवारा७ची योग्यता तपासून उमेदवारी द्यावी व विजयाकरिता सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्हा पक्ष निरीक्षक माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी केले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी माजी मंत्री सुबोध मोहिते (पक्ष निरीक्षक) बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, संजय बोडखे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, ग्रामीण यांची सभा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला अमरावती जिल्हा ग्रामीण पक्ष निरीक्षक माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, संजय बोडखे, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.पुढे बोलताना माजी आमदार बंडू सावरबांधे यांनी काँग्रेसच्या काळातील सरकारांनी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि गोरगरिबांना मदतीचा हात दिला. अतिवृष्टीची मदत, खरळचे नुकसान, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण या बिजेपी सरकारने शेतकऱ्याला मदत न करता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या सरकारविरुद्ध लढा देऊन जनतेसमक्ष यांचे खोटे कारणामे उघड करावे. वाढती महागाई, कापूस, धान, ज्वारी, सोयाबीन यांचे भाव कमी केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे त्यामुळे सरकारला काँग्रेसने धारेवर धरून जनतेला बिजेपी सरकारचा अच्छे दिन (बुरे दिन) अवगत करावे, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी केंद्र व राज्य सरकार यांचे खोटे आश्वासने व शासकीय योजनाचे नावे बदलून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडा व एकजुटीने कार्य करा असे सांगितले. आ. वीरेंद्र जगताप यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवीत बिजेपी शासनाचे खोटे आश्वासन जनतेसमोर ठेवण्याचे कार्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. यावेळी सभेला माजी आमदार सुलभा खोडके यांनी मार्गदर्शन केले. सभेकरिता माजी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा पुष्पा बोंडे, संजय खोडके, किशोर बोरकर, माजी आ. केवलराम काळे, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्र गैरवार, वनमाला खडके, प्रल्हाद ठाकरे, छाया दंडाळे, विद्या देडू, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, सुधाकर भारसाकळे, राजाभाऊ टवलारकर, रेखाताई पटेल, संजय लायदे, अनंत साबळे, दयाराम काळे, संजय तट्टे, भागवतराव खांडे, संजय मापले, प्रदीप कांबळे, बापूराव गायकवाड, प्रदीप देशमुख यशवंत मंगरोळे, अमोल जाधव, गणेशराव आरेकर, हरिश्चंद्र मुगल, मनोज जयस्वाल, श्रीकांत जोडपे, एजाजखान, सुनील गावंडे, प्रमोद टाकरखेडे, सुरेश आडे, दिवाकर देशमुख, कैलास आवारे, प्रकाश पुसदेकर आदींची उपस्थिती होती.स्थानिक स्वराज संस्थेची जाणून घेतली वस्तुस्थितीसभेमध्ये जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांतील समस्या पक्षसंघटन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्ष बलाबल याविषयी माहिती तालुकाध्यक्ष यांच्याकडून जाणून घेण्यात आली. महापालिका, जि.प., नगरपंचायत, ग्रामपंचायत आदिवर काँग्रेसचे अधिराज्य असल्याचे स्पष्ट झाले. यशोमती ठाकूर यांच्यावरील हल्ल्याचा निषेधयावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर शनिवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध काँग्रेस कमिटीतर्फे घेण्यात आला. हल्लेखोरांवर कारवाई किंवा गुन्हे दाखल न केल्यास जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.