शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन

By जितेंद्र दखने | Updated: February 17, 2024 23:06 IST

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत.

अमरावती : केंद्र सरकारची ‘हर घर जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या मार्च महिन्या अखेर पर्यत १०० टक्के कामे पूर्ण करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागासमोर उभे ठाकले आहे.  जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत. तर ३३७ कामे प्रगतिपथावर आहेत; मात्र ही कामे येत्या मार्चअखेरपर्यत पूर्ण होणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३२९ योजना पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ३३७ योजनांपैकी आजघडीला २८१ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे नळजोडणीत जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ जलजीवन मिशन ६६६ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये नळजोडणी कामे जवळपास पूर्ण केली आहे. मात्र योजनांच्या कामाबाबत संथगती सुरू आहे. 

जलजीवन मिशन म्हणजे काय?‘हर घर जल’ या संकल्पनेसह केंद्र सरकारने सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे पाणी आणि सुरक्षित पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन (जेजेएम) सुरू केले आहे. या योजनेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे.

जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कामाच्या बाबतीत अव्वल आहे. जलजीवन मिशनची कामे ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. शंभर टक्के कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती 

टॅग्स :WaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकार