शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जलजीवन मिशन : मार्चअखेरपर्यत ‘हर घर जल’ पोहोचणार तरी कसे? ६६६ पैकी ३३७  योजना पूर्ण करण्याचे आवाहन

By जितेंद्र दखने | Updated: February 17, 2024 23:06 IST

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत.

अमरावती : केंद्र सरकारची ‘हर घर जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या मार्च महिन्या अखेर पर्यत १०० टक्के कामे पूर्ण करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागासमोर उभे ठाकले आहे.  जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ६६६ योजनांपैकी आतापर्यत ३२९ योजना पूर्ण झाल्या आहेत. तर ३३७ कामे प्रगतिपथावर आहेत; मात्र ही कामे येत्या मार्चअखेरपर्यत पूर्ण होणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३२९ योजना पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ३३७ योजनांपैकी आजघडीला २८१ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे नळजोडणीत जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ जलजीवन मिशन ६६६ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये नळजोडणी कामे जवळपास पूर्ण केली आहे. मात्र योजनांच्या कामाबाबत संथगती सुरू आहे. 

जलजीवन मिशन म्हणजे काय?‘हर घर जल’ या संकल्पनेसह केंद्र सरकारने सन २०२४ पर्यत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे पाणी आणि सुरक्षित पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन (जेजेएम) सुरू केले आहे. या योजनेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे.

जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कामाच्या बाबतीत अव्वल आहे. जलजीवन मिशनची कामे ३१ मार्चपर्यत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. शंभर टक्के कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती 

टॅग्स :WaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकार