शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जनमान्य मालमत्ता करवाढीसाठी जागर

By admin | Updated: March 23, 2016 00:29 IST

स्थानिक संस्था कर प्रणाली संपुष्टात आल्याने महापालिकेवर आर्थिक अरिष्ट ओढवले आहे.

स्थायीचे पाऊल : अभिप्राय मागविलेअमरावती : स्थानिक संस्था कर प्रणाली संपुष्टात आल्याने महापालिकेवर आर्थिक अरिष्ट ओढवले आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, या पार्श्वभूमिवर स्थायी समितीने अमरावतीकर जनतेकडूनच उत्पन्नवाढीसाठी लेखी अभिप्राय मागविले आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच यासाठी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती विद्यार्थी, अभियंता, प्राध्यापक, जनप्रतिनिधी, व्यापारी, संस्था, प्रतिष्ठाने, शैक्षणिक क्षेत्रासह तमाम घटकांनी मालमत्ता करवाढ वगळता महापालिकेचे उत्पन्न कशाप्रकारे वाढू शकेल, याबाबत मार्गदर्शक सूचना, उपाययोजना लेखी स्वरुपात स्थायी समिती सभापतींकडे कळवाव्यात, असे आवाहन मार्डीकर यांनी केले आहे. महापालिका तुमची-आमची सर्वांची असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या जनपेक्षित विकासात्मक कामांच्या गरजा आणि मनपाचे आजचे उत्पन्न बघता उत्पन्न वाढ होणे आवश्यक आहे. ३१ मार्चला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पावर मर्यादित उत्पन्न स्रोताचेच सावट आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मालमत्ताधारकाला झेपेश अशी करवाढ करण्याच्या बाजूने आम्ही आहोतच. मात्र त्या व्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या मार्गाने उत्पन्नवाढ होऊ शकते, या दिशेने विचार करणे महत्त्वाचे असल्याने अमरावतीकरांना लेखी अभिप्राय कळवावेत, असे आवाहन स्थायी समितीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाकडून जोरकस प्रयत्नथकबाकी वसुलीकरिता महापालिका आयुक्त व प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत आहेत. त्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही अमरावतीकरांच्या नावे पाठविलेल्या पत्रातून मार्डीकरांनी दिली आहे. कायदेशीर व नियमाप्रमाणे योग्य असणारी उत्पन्नवाढीच्या सूचना, उपाययोजना अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २८ पर्यंत पाठवाव्यात सूचनाअमरावतीकर नागरिकांनी उत्पन्नाच्या नवीन स्रोताबाबत व अन्य सूचना, उपाययोजना २७ मार्चपर्यंत स्थायी समितीकडे लिखित स्वरुपात पाठवायच्या आहेत. याशिवाय २८ मार्चला कार्यालयीन वेळेत स्थायी सभापती कार्यालय, महापालिका अमरावती येथे प्रत्यक्षही पोहोचत्या करता येणार आहे.मालमत्ता करावरच भिस्तअन्य सर्व करांच्या तुलनेत महापालिकेची भिस्त मालमत्ता करावर अधिक आहे. मावळत्या आर्थिक वर्षात पालिकेला मालमत्ता करातून ४७ कोटी अपेक्षित आहेत. मात्र आतापर्यंत ६० टक्के वसुली झालीे. त्यामुळे नव्या उत्पन्नाच्या स्रोतावर पदाधिकारी गंभीर झाले आहेत.