शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

-हे तर प्रशासनाचेच ‘नरबळी’ !

By admin | Updated: August 7, 2015 00:25 IST

बिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती.

मोहन राऊत/राजाभाऊ मनोहरे अंजनसिंगीबिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती. हजार विनंत्या केल्यावरही शासनाने दखल घेतली नाही. अखेर अंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा, धारवाडा येथील ग्रामस्थांनी तब्बल पाच दिवस नाल्यातील पाण्यात ठिय्या देऊन पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने गावकऱ्यांचा आक्रोश वेळीच ऐकला असता तर आज हे चार मृत्यू कदाचित टाळता आले असते. हा अपघात नव्हे, प्रशासनाने घेतलेले ‘नरबळी’च होय, असा तीव्र संताप परिसरातील गावकऱ्यांनी म्हणूनच व्यक्त केला.पालक सचिवांनी केली होती पुलाची पाहणीअंजनसिंगी : निम्न वर्धाचे बॅकवॉटर या भागात येत आहे. तेथे योग्य त्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन शासनाने आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर विधानसभेत दिले होते. शेतकऱ्यांनी ५ दिवस पूलाच्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केले. आ. ठाकूर यांनी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाच्या नागपूर कार्यालयात या पुलाच्या मंजुरीसाठी धडक दिली होती. त्या अनुषंगाने जलसंपदाच्या प्रधान सचिव व जिल्ह्याच्या पालक सचिव यांनी या बिल्दोरी पुलाची पाहणी केली होती.पाण्यामुळे मृत्यू, प्राथमिक अंदाजचांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात चारही मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. पुराचे पाणी कारमध्ये शिरले व हे पाणी शरीरात गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक लिना भुतडा यांनी सांगितले.रपट्यावर नेहमी असते ‘बॅकवॉटर’बिल्दोरी नाल्यावरील रपट्यानंतर २०० मीटर अंतरावर वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या नदीत निम्न वर्धा धरणाचे बॅकवॉटर हे नेहमीच पुलावर असते. मात्र, संततधार पावसामुळे बिल्दोरी नाला ‘ओव्हरफ्लो’ झाला होता. वळण धोकादायक असल्याने ते वाहन चालकाच्या लक्षात येत नाही. दुर्गवाडा,आलवाडा ग्रामस्थांनी केले होते उपोषणअंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा येथील ग्रामस्थांची शेती बिल्दोरी नाल्याच्या दुसऱ्या बाजुला आहे़ ग्रामस्थांना या नदीच्या पात्रातूनच रोज ये-जा करावी लागते. विशेषत: दुर्गवाडा, आलवाडा येथील ग्रामस्थांना आर्वी ही बाजारपेठ असल्यामुळे दर आठवड्याला या नदीच्या पात्रातून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. यवतमाळ, बाभुळगाव, धामणगाव येथून कौंडण्यपूर, आर्वीला जाण्याकरितादेखील हाच मार्ग सोयीस्कर आहे़ त्यामुळेच बिल्दोरी नदीवरील पूल व्हावा, याकरिता दुर्गवाडा व आलवाडा येथील ग्रामस्थांनी आठ महिन्यांपूर्वी पाच दिवस या नाल्याच्या पात्रात बसून उपोषण केले होते़ या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. आ़यशोमती ठाकूर, आ़ वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरूण अडसड यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते़ एक महिन्यात पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी प्रशासनाने दिले होते. इतकेच नव्हे तर गेल्या रविवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, तिवसा येथील तहसीलदार विजय लोखंडे यांनी या पुलाची पाहणी केली होती. जीव गेलेत, मात्र निगरगट्ट प्रशासन जागचे हलले नाही.