शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

-हे तर प्रशासनाचेच ‘नरबळी’ !

By admin | Updated: August 7, 2015 00:25 IST

बिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती.

मोहन राऊत/राजाभाऊ मनोहरे अंजनसिंगीबिल्दोरी नाल्यावरील पुलावरुन कायम पाणी वाहत असल्याने तो जिवघेणा झाल्याची सर्वंकष कल्पना परिसरातील ग्रामस्थांना आली होती. हजार विनंत्या केल्यावरही शासनाने दखल घेतली नाही. अखेर अंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा, धारवाडा येथील ग्रामस्थांनी तब्बल पाच दिवस नाल्यातील पाण्यात ठिय्या देऊन पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने गावकऱ्यांचा आक्रोश वेळीच ऐकला असता तर आज हे चार मृत्यू कदाचित टाळता आले असते. हा अपघात नव्हे, प्रशासनाने घेतलेले ‘नरबळी’च होय, असा तीव्र संताप परिसरातील गावकऱ्यांनी म्हणूनच व्यक्त केला.पालक सचिवांनी केली होती पुलाची पाहणीअंजनसिंगी : निम्न वर्धाचे बॅकवॉटर या भागात येत आहे. तेथे योग्य त्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन शासनाने आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर विधानसभेत दिले होते. शेतकऱ्यांनी ५ दिवस पूलाच्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केले. आ. ठाकूर यांनी अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाच्या नागपूर कार्यालयात या पुलाच्या मंजुरीसाठी धडक दिली होती. त्या अनुषंगाने जलसंपदाच्या प्रधान सचिव व जिल्ह्याच्या पालक सचिव यांनी या बिल्दोरी पुलाची पाहणी केली होती.पाण्यामुळे मृत्यू, प्राथमिक अंदाजचांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात चारही मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. पुराचे पाणी कारमध्ये शिरले व हे पाणी शरीरात गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक लिना भुतडा यांनी सांगितले.रपट्यावर नेहमी असते ‘बॅकवॉटर’बिल्दोरी नाल्यावरील रपट्यानंतर २०० मीटर अंतरावर वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या नदीत निम्न वर्धा धरणाचे बॅकवॉटर हे नेहमीच पुलावर असते. मात्र, संततधार पावसामुळे बिल्दोरी नाला ‘ओव्हरफ्लो’ झाला होता. वळण धोकादायक असल्याने ते वाहन चालकाच्या लक्षात येत नाही. दुर्गवाडा,आलवाडा ग्रामस्थांनी केले होते उपोषणअंजनसिंगी, दुर्गवाडा, आलावाडा येथील ग्रामस्थांची शेती बिल्दोरी नाल्याच्या दुसऱ्या बाजुला आहे़ ग्रामस्थांना या नदीच्या पात्रातूनच रोज ये-जा करावी लागते. विशेषत: दुर्गवाडा, आलवाडा येथील ग्रामस्थांना आर्वी ही बाजारपेठ असल्यामुळे दर आठवड्याला या नदीच्या पात्रातून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. यवतमाळ, बाभुळगाव, धामणगाव येथून कौंडण्यपूर, आर्वीला जाण्याकरितादेखील हाच मार्ग सोयीस्कर आहे़ त्यामुळेच बिल्दोरी नदीवरील पूल व्हावा, याकरिता दुर्गवाडा व आलवाडा येथील ग्रामस्थांनी आठ महिन्यांपूर्वी पाच दिवस या नाल्याच्या पात्रात बसून उपोषण केले होते़ या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. आ़यशोमती ठाकूर, आ़ वीरेंद्र जगताप, माजी आमदार अरूण अडसड यांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते़ एक महिन्यात पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी प्रशासनाने दिले होते. इतकेच नव्हे तर गेल्या रविवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, तिवसा येथील तहसीलदार विजय लोखंडे यांनी या पुलाची पाहणी केली होती. जीव गेलेत, मात्र निगरगट्ट प्रशासन जागचे हलले नाही.