शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीत ठरले... शिष्टाईत हरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:11 IST

उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या पाठोपाठ अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना झालेली मारहाण आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला...

महापालिका कर्मचाऱ्यांचा संप : कुत्तरमारे मारहाण प्रकरण; संप स्थगितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या पाठोपाठ अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना झालेली मारहाण आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा या पार्श्वभूमिवर महापालिका अधिकारी-कर्मचारी संतप्त झाले. सोमवारी पहिल्या प्रहरात झालेल्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत संपाची भूमिका ठरविण्यासाठी मॅराथॉन चर्चा झाली. संपही जाहीर करण्यात आला. तथापि त्यानंतर झालेल्या राजकीय शिष्टाईत कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कमी पडले. बॅकफूटवर येत अधिकारी- कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी केले. कोतवाल शिष्टाईत हरल्याने शेकडो अधिकारी - कर्मचाऱ्यांनी उद्वेग व्यक्त केला.महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना रविवारी आ. रवि राणा यांचेसमक्ष मारहाण करण्यात आली. सोमवारी त्या मारहाणीचे पडसाद महापालिकेत उमटले. कुत्तरमारेविरुद्ध विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करत पुढील रणनिती बनविण्यासाठी आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात नरेंद्र वानखडे, महेश देशमुख या उभय उपायुक्तांसह कॅफो प्रेमदास राठोड, एडीटीपी सुरेंद्र कांबळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारी व मनपा कर्मचारी, कामगार संघाचे पदाधिकारी एकत्र आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रल्हाद कोतवाल यांनी २४ जुलैपासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याची नोटीस प्रशासनाला दिली. बैठकीत अतिशय जोरकसपणे गणेश कुत्तरमारे यांच्यावरील गुन्हा व मारहाणीचा निषेध करण्यात आला. आता काम करायचे की मार खायचा? हे एकदा स्पष्ट होवूच द्या, अशी भूमिका घेऊन बंदची हाक देण्यात आली. बैठकीतच झोनस्तरावर बंदबाबत कळविण्यात आले. दुपारी २ च्या सुमारास ‘बंद’ सुरू झाल्याची औपचारिक घोषणाही करण्यात आली. मात्र त्यानंतर आयुक्तांच्या दालनासह सभागृहात झालेल्या बैठकीत कोतवाल बॅकफुटवर आले व त्यांनी संप तूर्तास मागे घेत असल्याची घोषणा करून हायहोल्टेज ड्रामा संपुष्टात आणला.काम करायचे,अन् मारही खायचा उपअभियंत्याला झालेल्या मारहाणीची शाई वाळते न वाळते अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखाला मारहाण झाल्याने महापालिका अधिकारी कर्मचारी उद्विग्न झाले आहेत. काम करायचे, मारही खायचा आणि खोट्या गुन्ह्यात सामाजिक शिक्षा भोगायची, अशी प्रतिक्रिया देत कर्मचाऱ्यांनी संतापाला वाट मोकळी केली. सकाळी १० वाजतापासूनच महापालिकेत बंदसदृश्य स्थिती होती. आम्हीही कुटुंबवत्सल आहोत. राजकारणात आमचा बळी का, असा संतप्त सवालही त्यांचेकडून उपस्थित करण्यात आला. एकाच आठवडयात मारहाणीचे दोन प्रकार घडल्याने कर्मचारी अस्वस्थ झालेत. सोमवारच्या बैठकीत त्यांची अस्वस्थता उघडपणे व्यक्त झाली. कुत्तरमारे यांचेवर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी बैठकीदरम्यान करण्यात आली. सुमारे तीन तास झालेल्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. दुपारनंतर संप स्थगित केला.विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्थीविरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आणि बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी संपाबाबत आयुक्तांसह प्रल्हाद कोतवाल, जीवन सदार व अन्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. सुहास चव्हाण प्रकरणात आताच दोन दिवसांपूर्वी बंद पुकारण्यात आला. आता बंद करणे सौजन्याला धरून नसेल. बंद पुकारणे हा पर्याय असू शकत नाही, असा पवित्रा ‘तोडगा’ बैठकीत घेण्यात आला. तीनही पदाधिकाऱ्यांनी कोतवाल आणि सदार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचा परिपाक म्हणून कोतवाल यांनी संप तूर्त स्थगित केलाअशा होत्या मागण्या२३ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यावरील हल्ल्यासंदर्भात सचिन भेंडे, आ. रवि राणा व इतर हल्लेखोरांना अटक तसेच संबंधित हल्लेखोर सचिन भेंडे यांचे महापालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदार म्हणून असलेला परवाना रद्द करावा व त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, कुत्तरमारे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांच्या परवानगीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बोलावू नये, आयुक्तांच्या परवानगीशिवाय महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांवर प्रशासकीय संदर्भातून निर्माण झालेल्या वादाबाबत कोणत्याही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येऊ नये. आश्वासनानंतर संप स्थगितमहापालिकेच्या अतिक्रमण विभागाते प्रमुख कुत्तरमारे यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन आ. रवि राणा यांनी दिल्याने संप स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. मात्र एकदा दाखल झालेले गुन्हे राणा कसे काय मागे घेऊ शकतात, या प्रश्नावर कोतवाल निरूत्तर झाले.