शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

‘उत्तरपत्रिका कचऱ्यात’ मुद्दा सिनेटमध्ये गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले.

ठळक मुद्देमनीष गवर्इंचा पुढाकार : भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कचऱ्यात उत्तरपत्रिका आढळल्याचा मुद्दा येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेटमध्ये गाजणार आहे. राज्यपालनामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, औचित्याच्या मुद्दा ठरवित याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले. मात्र, सिनेट सदस्य मनीष गवई यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे साधन मानले जाते. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवल्या जात नसतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे सुरक्षित असणार, असा प्रतिप्रश्न मनीष गवई यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.मनीष गवई यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. मूल्यांकनात त्रुटी, उशिराने निकाल, परीक्षा केंद्रांवर वेळेत प्रश्नपत्रिका न पोहोेचणे, परीक्षेच्या वेळापत्रकात चुका, गुणपत्रिकांमध्ये गोंधळ अशा एक ना अनेक मुद्द्यांवर परीक्षा विभाग ‘फेल’ ठरला आहे. परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांची धुरा सांभाळणाºया माइंड लॉजिक एजन्सीच्या करारनाम्यावर गवई यांनी आक्षेप नोंदविला आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे उत्तरपत्रिका कचºयात गेल्याचा आरोप सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केला आहे.उत्तरपत्रिका कचऱ्यात कशा गेल्यात? याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा औचित्याचा ठरवून सिनेटमध्ये या विषयावर मुद्देसूद चर्चेद्वारे घणाघात करण्यात येणार आहे.- मनीष गवई, सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठ