शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘उत्तरपत्रिका कचऱ्यात’ मुद्दा सिनेटमध्ये गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले.

ठळक मुद्देमनीष गवर्इंचा पुढाकार : भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कचऱ्यात उत्तरपत्रिका आढळल्याचा मुद्दा येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेटमध्ये गाजणार आहे. राज्यपालनामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, औचित्याच्या मुद्दा ठरवित याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले. मात्र, सिनेट सदस्य मनीष गवई यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे साधन मानले जाते. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवल्या जात नसतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे सुरक्षित असणार, असा प्रतिप्रश्न मनीष गवई यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.मनीष गवई यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. मूल्यांकनात त्रुटी, उशिराने निकाल, परीक्षा केंद्रांवर वेळेत प्रश्नपत्रिका न पोहोेचणे, परीक्षेच्या वेळापत्रकात चुका, गुणपत्रिकांमध्ये गोंधळ अशा एक ना अनेक मुद्द्यांवर परीक्षा विभाग ‘फेल’ ठरला आहे. परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांची धुरा सांभाळणाºया माइंड लॉजिक एजन्सीच्या करारनाम्यावर गवई यांनी आक्षेप नोंदविला आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे उत्तरपत्रिका कचºयात गेल्याचा आरोप सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केला आहे.उत्तरपत्रिका कचऱ्यात कशा गेल्यात? याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा औचित्याचा ठरवून सिनेटमध्ये या विषयावर मुद्देसूद चर्चेद्वारे घणाघात करण्यात येणार आहे.- मनीष गवई, सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठ