शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला ‘इर्विन’चे डॉक्टर वैतागले

By admin | Updated: February 4, 2016 00:10 IST

जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या अरेरावीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इर्विन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना उपचारार्थ दाखल केले जाते. त्यामध्ये काही रुग्ण आपात्कालीन स्थितीतसुध्दा येतात. रुग्णालयात रुग्ण दाखल होताच डॉक्टर व परिचारिका तत्काळ उपचार सुरू करतात. मात्र, रुग्णांसोबत राजकीय कार्यकर्ते असल्यास त्यांची अरेरावी डॉक्टरांना सहन करावी लागते. पदाचा, पक्षनेत्याचे नाव सांगून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजकीय कार्यकर्ते रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करीत आमच्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड करतात. यासंदर्भात वाद करून मोठमोठ्या आवाजात गोंधळही घालतात. त्यामुळे डॉक्टरांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडसर निर्माण होत आहे. इर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओघ सुरु असल्यामुळे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. रूग्णांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार येथील परिचारिका व डॉक्टर तत्काळ योग्य ती तपासणी करतात. मात्र, तरीही रुग्णांवर योग्य उपचार करीत नसल्याचा ठपका नेहमीच डॉक्टरांवर ठेवण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नसल्याचे आढळून आले आहे. राजकीय नेत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा वरदहस्त रोखण्याकरिता योग्य ते पाऊल उचलण्याची येथील डॉक्टरांची मागणी आहे. आम्ही रुग्णांकडे तत्काळ लक्ष देऊन आरोग्य सेवा पुरवितो. मात्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विनाकारण वाद करून रुबाब टाकण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारांमुळे ओपीडीत गोंधळ निर्माण होऊन आरोग्य सेवा पुरविण्यात अडथळा निर्माण होतो. - उज्ज्वला मोहोड,वैद्यकीय अधिकारी. आमच्यासाठी सर्व रुग्ण सारखेच असतात. त्यांना योग्य सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते रुबाब दाखवीत दबाव आणतात. आम्हाला ओळखत नाही का, नमस्कार का केला नाही, असेही म्हणतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे गोंधळ निर्माण होतो आणि आरोग्य सेवाही विस्कळीत होते. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी,