शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला ‘इर्विन’चे डॉक्टर वैतागले

By admin | Updated: February 4, 2016 00:10 IST

जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या अरेरावीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इर्विन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना उपचारार्थ दाखल केले जाते. त्यामध्ये काही रुग्ण आपात्कालीन स्थितीतसुध्दा येतात. रुग्णालयात रुग्ण दाखल होताच डॉक्टर व परिचारिका तत्काळ उपचार सुरू करतात. मात्र, रुग्णांसोबत राजकीय कार्यकर्ते असल्यास त्यांची अरेरावी डॉक्टरांना सहन करावी लागते. पदाचा, पक्षनेत्याचे नाव सांगून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजकीय कार्यकर्ते रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करीत आमच्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड करतात. यासंदर्भात वाद करून मोठमोठ्या आवाजात गोंधळही घालतात. त्यामुळे डॉक्टरांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडसर निर्माण होत आहे. इर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओघ सुरु असल्यामुळे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. रूग्णांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार येथील परिचारिका व डॉक्टर तत्काळ योग्य ती तपासणी करतात. मात्र, तरीही रुग्णांवर योग्य उपचार करीत नसल्याचा ठपका नेहमीच डॉक्टरांवर ठेवण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नसल्याचे आढळून आले आहे. राजकीय नेत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा वरदहस्त रोखण्याकरिता योग्य ते पाऊल उचलण्याची येथील डॉक्टरांची मागणी आहे. आम्ही रुग्णांकडे तत्काळ लक्ष देऊन आरोग्य सेवा पुरवितो. मात्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विनाकारण वाद करून रुबाब टाकण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारांमुळे ओपीडीत गोंधळ निर्माण होऊन आरोग्य सेवा पुरविण्यात अडथळा निर्माण होतो. - उज्ज्वला मोहोड,वैद्यकीय अधिकारी. आमच्यासाठी सर्व रुग्ण सारखेच असतात. त्यांना योग्य सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते रुबाब दाखवीत दबाव आणतात. आम्हाला ओळखत नाही का, नमस्कार का केला नाही, असेही म्हणतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे गोंधळ निर्माण होतो आणि आरोग्य सेवाही विस्कळीत होते. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी,