शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

राजकीय कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला ‘इर्विन’चे डॉक्टर वैतागले

By admin | Updated: February 4, 2016 00:10 IST

जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने येथे सेवा देणारे डॉक्टर वैतागले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या अरेरावीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या इर्विन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना उपचारार्थ दाखल केले जाते. त्यामध्ये काही रुग्ण आपात्कालीन स्थितीतसुध्दा येतात. रुग्णालयात रुग्ण दाखल होताच डॉक्टर व परिचारिका तत्काळ उपचार सुरू करतात. मात्र, रुग्णांसोबत राजकीय कार्यकर्ते असल्यास त्यांची अरेरावी डॉक्टरांना सहन करावी लागते. पदाचा, पक्षनेत्याचे नाव सांगून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजकीय कार्यकर्ते रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करीत आमच्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची ओरड करतात. यासंदर्भात वाद करून मोठमोठ्या आवाजात गोंधळही घालतात. त्यामुळे डॉक्टरांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडसर निर्माण होत आहे. इर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओघ सुरु असल्यामुळे दररोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. रूग्णांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार येथील परिचारिका व डॉक्टर तत्काळ योग्य ती तपासणी करतात. मात्र, तरीही रुग्णांवर योग्य उपचार करीत नसल्याचा ठपका नेहमीच डॉक्टरांवर ठेवण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नसल्याचे आढळून आले आहे. राजकीय नेत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा वरदहस्त रोखण्याकरिता योग्य ते पाऊल उचलण्याची येथील डॉक्टरांची मागणी आहे. आम्ही रुग्णांकडे तत्काळ लक्ष देऊन आरोग्य सेवा पुरवितो. मात्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विनाकारण वाद करून रुबाब टाकण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारांमुळे ओपीडीत गोंधळ निर्माण होऊन आरोग्य सेवा पुरविण्यात अडथळा निर्माण होतो. - उज्ज्वला मोहोड,वैद्यकीय अधिकारी. आमच्यासाठी सर्व रुग्ण सारखेच असतात. त्यांना योग्य सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते रुबाब दाखवीत दबाव आणतात. आम्हाला ओळखत नाही का, नमस्कार का केला नाही, असेही म्हणतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे गोंधळ निर्माण होतो आणि आरोग्य सेवाही विस्कळीत होते. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी,