शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री असताना सिंचन प्रकल्प अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:49 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देबच्चू कडू : पुसला येथे दुष्काळग्रस्तांची परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.वरूड तालुक्यातील सिंचनासह प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न कायम आहे. दोन वेळा संत्रा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पण वीटही लागली नाही. संत्रा, तुरीला हमी भाव द्या, म्हणजे शेतकऱ्यांचे भले होईल. केवळ गोष्टी करून चालणार नाही. नोकरदारांना सातवा वेतन आयोग दिला म्हणजे शेतकरी सुखी होईल, असे नाही. प्रहारचे केवळ पाच आमदार सभागृहात आलेत ना, तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय श्रीराव, उदघाटक सरपंचा सारिका चिमोटे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे, शेतकरी नेते दिलीप भोयर, भाजपचे प्रभाकर काळे, राहुल देशमुख, प्रदीप कांबळे, प्रहारचे अनिल खांडेकर, राजश्री श्रीराव, गजानन डाहाके, लोकेश अग्रवाल, नगरसेवक मुन्ना तिवारी, उमेश दवंडे, सुनीता डाहाके, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक देवते, माजी नगराध्यक्ष प्रशांत सावरकर, रवींद्र शेळके, शाहरुक सोदागर, राजू वरुडकर, सूरज धर्मे, नईम खान आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेला हारार्पण करून चिखलदरा येथील बिहार रेजिमेंटचे जवान शहीद मुन्ना सेलूकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक समीर ठाकरे, तर संचालन विशाखा निकम आणि आभार मंगेश गजभिये यांनी मानले. दुष्काळी परिषदेला पंचक्रोशीतून हजारो शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.बच्चू कडू यांच्या रॅलीला पुसल्यात उत्स्फूर्त प्रतिसादविजय श्रीराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे नेते, प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची पुसला येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.