शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

विदर्भाचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री असताना सिंचन प्रकल्प अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:49 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देबच्चू कडू : पुसला येथे दुष्काळग्रस्तांची परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.वरूड तालुक्यातील सिंचनासह प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न कायम आहे. दोन वेळा संत्रा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पण वीटही लागली नाही. संत्रा, तुरीला हमी भाव द्या, म्हणजे शेतकऱ्यांचे भले होईल. केवळ गोष्टी करून चालणार नाही. नोकरदारांना सातवा वेतन आयोग दिला म्हणजे शेतकरी सुखी होईल, असे नाही. प्रहारचे केवळ पाच आमदार सभागृहात आलेत ना, तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय श्रीराव, उदघाटक सरपंचा सारिका चिमोटे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे, शेतकरी नेते दिलीप भोयर, भाजपचे प्रभाकर काळे, राहुल देशमुख, प्रदीप कांबळे, प्रहारचे अनिल खांडेकर, राजश्री श्रीराव, गजानन डाहाके, लोकेश अग्रवाल, नगरसेवक मुन्ना तिवारी, उमेश दवंडे, सुनीता डाहाके, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक देवते, माजी नगराध्यक्ष प्रशांत सावरकर, रवींद्र शेळके, शाहरुक सोदागर, राजू वरुडकर, सूरज धर्मे, नईम खान आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेला हारार्पण करून चिखलदरा येथील बिहार रेजिमेंटचे जवान शहीद मुन्ना सेलूकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक समीर ठाकरे, तर संचालन विशाखा निकम आणि आभार मंगेश गजभिये यांनी मानले. दुष्काळी परिषदेला पंचक्रोशीतून हजारो शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.बच्चू कडू यांच्या रॅलीला पुसल्यात उत्स्फूर्त प्रतिसादविजय श्रीराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे नेते, प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची पुसला येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.