शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कालव्याचे पाणी नदी-नाल्यांत धामणगावात सिंचनाचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देगवत, झाडे-झुडपे वाढली, यांत्रिकी विभागाची कागदोपत्रीच कामे

  लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी वाढलेल्या झाडे-झुडुपे व गवतावाटे नदी-नाल्यांनी वाहत आहे. त्यामुळे सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व चण्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली़. १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फारशी फलद्रुप झाली नाही.नदी-नाल्याने वाहते पाणी धामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव, घुसळी, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून शेतकऱ्यांना रबी हंगामात पाणी दिले जाते. हे सोडलेले पाणी मोजक्याच वितरिकेतून जाते. झाडे-झुडुपे काढली जात नसल्यामुळे गहू व हरभरा पिकाला पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी नाल्यात शिरत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तीन वर्षांत कागदावरच कामेअप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यापूर्वी कालव्यातील झाडे झुडपे व गवत प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने काढण्यात येते. प्रत्यक्षात मशीनचे भाडे काढण्यापुरतेच कामे केली जातात. काही ठिकाणी झाडेझुडपे काढली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.प्रकल्पाच्या यांत्रिक विभागाने कालव्याची साफसफाई केली नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून लक्षात आले. या विभागातील संबंधितांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे.- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प