शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आयपीएस चौकशी पथकाचा एसपी कार्यालयात तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, असा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक चौकशी पथक गठित केले.

ठळक मुद्देधारणी पोलिसांच्या तपासातील बारकाव्यांची पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथक बुधवारी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी १० ते १ असे तब्बल तीन तास होते. धारणी पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची या पथकाने तपासणी केली.गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, असा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली प्राथमिक चौकशी पथक गठित केले. या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल दरम्यान चमूने दीपाली प्रकरणाशी निगडीत लोकांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. याच दिवशी दीपाली यांच्या पतीने नोंदविलेल्या बयाणांचे ‘क्रॉस चेकिंग’ करण्यात आले. २७ एप्रिल रोजी सरवदे यांनी हरिसाल गाठले. वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली यांचे शासकीय निवासस्थान तसेच काही ठिकाणी भेटी दिल्या. स्थानिकांशी संवाद साधला. आता सरवदे यांना ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे चौकशी अहवाल सादर करावा लागेल. त्या बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबईकडे रवाना झाल्या. तथापि, उर्वरित चमूने एसपी कार्यालय गाठले व प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळलेआयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक २१ ते २८ एप्रिल या दरम्यान अमरावती, हरिसाल येथे दौऱ्यावर होते. मात्र, या आठ दिवसांत प्रसारमाध्यमांशी कुणीही बोलले नाही.जे काही चौकशीत असेल, तो अहवाल राज्य शासनाला सादर केला जातील, एवढेच टिपिकल उत्तर पथकाचे होते.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग