शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेला अवैध धंद्याची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:01 IST

सोमवारला ज्या ठिकाणी जुगार चालू होता, जुगाराच्या खेळातील वादातून हत्या झाली, ती जागा खुली, सार्वजनिक, शासकीय आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी खुलेआम जुगार चालू होता. घटनेच्या दिवशीच जुगार भरला असे नाही. नेहमीच या परिसरात खुले आम जुगाराचा खेळ खेळला जातो.

ठळक मुद्देपरतवाड्यात २४ वर्षांत तिसऱ्यांदा संचारबंदी : पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात घडलेल्या तीन खुनांना अवैध धंद्याची किनार आहे. सोमवारी घडलेल्या पहिल्या खुनाच्या घटनेला पूर्ववैमनस्यासह जुगाराच्या खेळातील वाद कारणीभूत ठरला. मारणारे आणि मरणारा दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या कलमांन्वये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.खरे तर शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गांजा, जुगार, वरली मटक्यांसह अनेक अवैध धंदे शहरात खुलेआम सुरू आहेत. याचा फटका युवा पिढीसह नागरिकांना बसत आहे. चोऱ्या, दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. यात नागरिकांची सुरक्षा व शहरातील कायदा व सुव्यवस्था वेठीस धरली जात आहे.सोमवारला ज्या ठिकाणी जुगार चालू होता, जुगाराच्या खेळातील वादातून हत्या झाली, ती जागा खुली, सार्वजनिक, शासकीय आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी खुलेआम जुगार चालू होता. घटनेच्या दिवशीच जुगार भरला असे नाही. नेहमीच या परिसरात खुले आम जुगाराचा खेळ खेळला जातो.उघड्यावरील या जुगारानेच खरे तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, अवैध धंद्यांप्रति त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. अवैध धंद्यांना त्यांनी दिलेली सूट निर्ढावलेपणा स्पष्ट करणारा ठरला आहे. अवैध धंद्यांची किनार असलेले ही पहिली घटना नाही. काही महिन्यांपूर्वी अचलपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाचा बळीही या अवैध धंद्यातूनच गेला. गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासत अवैध धंद्यात गुंतलेल्यांनीच त्या पोलीस शिपायाचा बळी घेतला आहे.अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी आपल्या आदेशात कलम १४४ चा उल्लेख केला आहे. शहरात संचारबंदी लागू आहे. घरातून कुणीही बाहेर येऊ नये, अशा सूचना गस्तीवरील बंदोबस्तातील पोलीस नागरिकांना देत आहेत. यामुळे संचारबंदी की जमावबंदी, यावर संभ्रम निर्माण होत आहे.आचार संहितेदरम्यान पहिल्यांदा संचारबंदीमागील २४ वर्षांत परतवाडा शहरात संचारबंदी लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. ३१ आॅक्टोबर १९९५ ला माजी नगरसेवक सुहास कानेटकर यांच्या खुनानंतर शहरासह धोतरखेड्यात संचारबंदी लावण्यात आली होती. यानंतर शहरातील गणेशनगर स्थित एका विवाहीत महिलेला तीन युवकांनी घरात घुसून पेट्रोल टाकून ३० नोव्हेंबर, २००३ ला पेटविले होते. यात एक युवकही जळाला होता. जळालेल्या युवकाच्या मृत्यूनंतर १ डिसेंबर २००३ ला शहरात संचारबंदी लावण्यात आली होती. योगायोग असा की, या तिन्ही संचारबंदी सोमवारीच लावल्या गेल्या आहेत. आचारसंहितेदरम्यान लागलेली ही पहिलीच संचारबंदी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी