शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन; महापालिकास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 07:00 IST

आतापर्यंत राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्देजैवविविधता नोंदीसाठी ४० हजारांचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: निसर्ग साखळीत अनेक जीवजंतू महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, शासन, प्रशासन स्तरावर जैवविविधता संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परिणामी भूतलावरील बहुतांश जैवविविधता नामशेष होण्याची भीती वर्तविली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने आतापर्यंत २७ हजार गावांमध्ये स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या माध्यमातून गावांमध्ये लोकजैवविविधता नोंद केली जात आहे.जैवविविधतेत प्रामुख्याने पशू, पक्षी, वन्यप्राणी, प्राणीसृष्टी, जिवंत वनस्पती आदींचा समावेश करण्यात आला आहे. जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी सन २०१२ मध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली. जैवविविधता कायदा २००२ नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे गठन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आतापर्यंत जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे.ग्राम समितीला हे आहेत अधिकारजैवविविधता कायदा २००२ नुसार गाव आणि परिसरात जैवविविधता संवर्धन, जतन करण्याचे अधिकार स्थानिक ग्राम समितीला बहाल करण्यात आले आहे. जीवाणू, विषाणूंचा कोणी नियमानुसार वापर करीत असल्यास स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना उत्पन्न मागण्याचे अधिकार आहेत. प्रसंगी जैवविविधता वापरास ही समिती नकार देऊ शकते, असे कायद्यात नमूद आहे.जैवविविधता नोंदीसाठी ४० हजारांचे अनुदानगावपातळीवर लोकजैवविविधतेची नोंद घेणे, त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीला दरवर्षी ४० हजारांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामार्फत प्रदान केली जात असून, आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावांमध्ये जैवविविधता नोंदीसाठी अनुदान देण्यात आले आहे.जैवविविधता वारसास्थळ केले घोषितभूतलावर जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने काही स्थळांना जैवविविधता वारसास्थळ घोषित केले आहे. तेथील जैवविविधता सुरक्षित ठेवण्यासाठी हे मोलाचे प्रयत्न मानले जात आहेत. यात आलापल्ली येथील वनवैभव, गोंदिया, पुणे, जळगाव, गडचिरोली, मेळघाट येथील हेरिटेजचा समावेश आहे.नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जैवविविधतेचे संवर्धन केले जात आहे. लोकजैवविविधता जतन करणे आणि त्याची नोंद घेण्यासाठी गावांना प्रत्येकी ४० हजारांचे अनुदान वितरित केले जाते. जैवविविधता संवर्धनासाठी शासनासोबत चर्चा करून त्याची अंमलबजावणीचे काम सुरू आहे.- जयंत वडतकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ.

 

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवस