शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आयएफएस लॉबीत अंतर्गत कलह, वन विभागात कामकाजावर परिणाम

By गणेश वासनिक | Updated: May 6, 2023 17:50 IST

अमरावती: राज्याच्या वन विभागात भारतीय वन सेवा अधिकारी (आयएफएस) यांच्यात दोन गट पडले आहे. वनबल प्रमुख विरूद्ध ईतर आयएफएस ...

अमरावती: राज्याच्या वन विभागात भारतीय वन सेवा अधिकारी (आयएफएस) यांच्यात दोन गट पडले आहे. वनबल प्रमुख विरूद्ध ईतर आयएफएस असा सामना सुरु झाला आहे. आयएफएस लॉबीच्या अंतर्गत कलहाचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र आहे.राज्याच्या वन विभागाने शाखेचा विस्तार केल्यानंतर वरिष्ठ आयएफएस पदांची संख्या सोयीनुसार वाढ करण्यात आली.

गत काही वर्षापूर्वी वन विभागाच्या अधिकारी वर्गाने केवळ तीन वनबल प्रमुख, प्रधान मुख्य वनसंरक्षक अस्तित्वात होते. मात्र, ग्रेड श्रेणी वाढवून घेण्यासाठी राज्यात आजमितीला वन विभागात सात प्रधान मुख्य वनसंरक्षक, २२ अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक़ अशी पदांची वाढ करण्यात आली. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र वन विभागाची कमान ही उत्तरप्रदेश, बिहार या उत्तर भारतीय आयएफएस अधिकाऱ्यांकडे होती. मात्र गत चार वर्षात वनबल प्रमुखाची सूत्रे दक्षिण भारतीय आयएफएस अधिकाऱ्यांकडे गेल्यामुळे उत्तर भारतीय विरूद्ध असा सामना नेहमीच दिसून येते. वायएलपी राव हे वनबल प्रमुख आहेत. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंग तर ईतर प्रधान मुख्य वनसंरक्षकामध्ये शैलेंद्र टेभुर्णीकर हे कॅम्पाची जबाबदारी सांभाळतात.

दोन वर्षापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी वन्यजीव कमान हाती घेतल्यानंतर विकास खारगे हे वन विभागाचे प्रधान सचिव असल्याचे महाराष्ट्राची चलती होती.तथापि, त्यानंतर महाराष्ट्राचा वरचष्मा कमी झाल्यानंतर पुन्हा वन विभागात उत्तर विरूद्ध दक्षिण असा सामना सुरू झाला आहे. त्यामुळे वनसंरक्षणाच्या कामावर गंभीर परिणामी जाणवत आहे. दोन आठवड्यापूर्वी चंद्रपूर येथे वन विकास प्रबोधनीत झालेल्या वरिष्ठ आयएफएस अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत वनविकास कामांच्या निधीवरून चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मोक्याच्या जागेवर दक्षिण आफएफएसची पोस्टींग

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदाचे सूत्रे स्वीकारल्यानंतर वन विभागाच्या प्रशासकीय कामकाजात ते हस्तक्षेप टाळतात.आयएफएस अधिकाऱी याचाच फायदा चांगला घेत आहे. वन मंत्रालयात वेणुगोपाल रेड्डी हे प्रधान वन सचिव असल्याने आयएफएस दक्षिण लॉबीला बळ मिळत असल्याचे चित्र आहे. उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना बदली होताना मोक्याचे ठिकाण मिळत आहे. तर उत्तर भारतीय आयएफएस अधिकाऱ्यांची कोंडी होत असल्याचे दिसून येते.वाहनांचा तुटवडा, निधीची कमतरता

पूर्वीच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री वजा अर्थमंत्री होते. त्यामुळे ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणातनिधी मिळाला होता. आताच्या मंत्रिमंडळात वन विभागात निधीला कात्री लावली. वाहनांना ईंधन नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, वन्यजीव व्यवस्थापनावर परिणाम झाला आहे. वाहनांचा तुटवडा आहे. अद्यावत वाहने नसल्याने विरष्ठ अधिकारी दौऱ्यापासून दोन हात दूरच आहेत.