शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

विमा कंपनीची बेपर्वाई, भरपाई जमाच नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:01 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा : १५ दिवसांपूर्वी साडेपाच कोटींचा रबी विमा जाहीरअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. मात्र, १५ दिवसांपासून विमा कंपनीद्वारा बँकांकडे भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विमा कंपनीच्या बेपर्वाईमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकला नाही. रबी हंगाम २०१५ मध्ये पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अतोनात हानी झाली. याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना राबविण्यात आली. जिल्ह्यातल गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा व भूईमूग या अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यातील ११७ महसूल मंडळात ही योजना राबविण्यात आली होती. जिल्ह्यात बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभऱ्याकरिता ६४ महसूल मंडळात ही योजना होती. सरासरी उत्पन्नाच्या एकूण १५० टक्क्यांपर्यंत कमाल संरक्षण या योजनेत असल्यामुळे जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजारांचा विमा शासनाने दोन आठवड्यापूर्वी मंजूर केला. प्रत्यक्षात विमा कंपन्यांद्वारा ही रक्कम अग्रणी बँकेकडे जमा करण्यात आली नाही. त्यामुळे अग्रणी बँकेद्वारा इतर बँकांना नुकसान भरपाईची रक्कम देता आलेली नाही, असे या बँकेने सांगितले. यासंदर्भात विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) अशी मिळणार गव्हाची भरपाई गव्हासाठी जिल्ह्यात १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची भरपाई मिळणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४५ शेतकऱ्यांना २८ हजार ४५४ रुपये, भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना एक लाख ४५ हजार १५७ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना एक लाख २२ हजार ३०७ रुपये, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ६ लाख ६१ हजार ९२१ रुपये, वरुड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांना एक लाख १६ हजार १५५ रुपयांची भरपाई मिळणार आहे. सरासरी उत्पन्नाची आकडेवारीच ग्राह्ययोजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाईस्थिती यासंदर्भात शासनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आलेली नाही. यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक सर्वेक्षण अंदाजाच्या पीककापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यामुळे ही आकडेवारीच नुकसानभरपाई निश्चित करताना ग्राह्य धरली जाणार आहे. रबी २०१५ हंगामासाठी पीकविमा जाहीर झाला. मात्र, यासाठीची भरपाई विमा कंपन्यांद्वारा आतापर्यंत जमा करण्यात आलेली नाही. रक्कम जमा झाल्यास संबंधित बँकांना त्वरित वितरित करण्यात येईल. - सुनील रामटेके व्यवस्थापक, अग्रणी बँक पीकविम्याची भरपाई विमा कंपनीद्वारा लीड बँकेकडे जमा करण्यात येते. तेथून ती शेतकऱ्यांनी ज्या बँकेत विमा काढला असेल त्या बँकांमध्ये जमा करण्यात येते. तेथून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जातो. -दत्तात्रय मुडेजिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी