शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीची बेपर्वाई, भरपाई जमाच नाही

By admin | Updated: March 16, 2017 00:01 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला.

शेतकऱ्यांना प्रतीक्षा : १५ दिवसांपूर्वी साडेपाच कोटींचा रबी विमा जाहीरअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०१५ मध्ये पीकविमा काढला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. मात्र, १५ दिवसांपासून विमा कंपनीद्वारा बँकांकडे भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विमा कंपनीच्या बेपर्वाईमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळू शकला नाही. रबी हंगाम २०१५ मध्ये पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अतोनात हानी झाली. याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना राबविण्यात आली. जिल्ह्यातल गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा व भूईमूग या अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यातील ११७ महसूल मंडळात ही योजना राबविण्यात आली होती. जिल्ह्यात बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभऱ्याकरिता ६४ महसूल मंडळात ही योजना होती. सरासरी उत्पन्नाच्या एकूण १५० टक्क्यांपर्यंत कमाल संरक्षण या योजनेत असल्यामुळे जिल्ह्यातील १५ हजार ८८९ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यापैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजारांचा विमा शासनाने दोन आठवड्यापूर्वी मंजूर केला. प्रत्यक्षात विमा कंपन्यांद्वारा ही रक्कम अग्रणी बँकेकडे जमा करण्यात आली नाही. त्यामुळे अग्रणी बँकेद्वारा इतर बँकांना नुकसान भरपाईची रक्कम देता आलेली नाही, असे या बँकेने सांगितले. यासंदर्भात विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) अशी मिळणार गव्हाची भरपाई गव्हासाठी जिल्ह्यात १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची भरपाई मिळणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४५ शेतकऱ्यांना २८ हजार ४५४ रुपये, भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना एक लाख ४५ हजार १५७ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना एक लाख २२ हजार ३०७ रुपये, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ६ लाख ६१ हजार ९२१ रुपये, वरुड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांना एक लाख १६ हजार १५५ रुपयांची भरपाई मिळणार आहे. सरासरी उत्पन्नाची आकडेवारीच ग्राह्ययोजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाईस्थिती यासंदर्भात शासनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आलेली नाही. यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक सर्वेक्षण अंदाजाच्या पीककापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यामुळे ही आकडेवारीच नुकसानभरपाई निश्चित करताना ग्राह्य धरली जाणार आहे. रबी २०१५ हंगामासाठी पीकविमा जाहीर झाला. मात्र, यासाठीची भरपाई विमा कंपन्यांद्वारा आतापर्यंत जमा करण्यात आलेली नाही. रक्कम जमा झाल्यास संबंधित बँकांना त्वरित वितरित करण्यात येईल. - सुनील रामटेके व्यवस्थापक, अग्रणी बँक पीकविम्याची भरपाई विमा कंपनीद्वारा लीड बँकेकडे जमा करण्यात येते. तेथून ती शेतकऱ्यांनी ज्या बँकेत विमा काढला असेल त्या बँकांमध्ये जमा करण्यात येते. तेथून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जातो. -दत्तात्रय मुडेजिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी