शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

‘त्या’ वनजागेवरील मूर्ती हटविण्याचे निर्देश

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली.

आठवडाभराचा अल्टिमेटम् : सीसीएफ, डीएफओंची घटनास्थळी भेटअमरावती : येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. अतिक्रमणधारकांना मूर्ती व अन्य वस्तू त्वरेने हटविण्याचे निर्देश देण्यात आलेत.मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी वनाधिकाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमित धार्मिक स्थळी पोहोचला. या स्थळी बुध्दविहारस तयार करण्यात आले असून येथे पंचशील ध्वज उभारण्यात आला आहे. याच परिसरात नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्त्वात वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. येथे उपस्थित भन्ते संघपाल आदी कार्यकर्त्यांना हे अतिक्रमण हटविण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. आठवड्याच्या आत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण न हटविल्यास वनविभाग हे अतिक्रमण काढून घेणार, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा निर्मितीचे सुरु असलेले कार्य वनाधिकाऱ्यांनी बंद पाडले. हे अतिक्रमण दीड ते दोन वर्षांपासून असताना ते आतापर्यंत वनविभागाने का हटविले नाही, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. वनविभागाच्या टेकडीवरील दर्शनी भागात हे धार्मिक अतिक्रमण केले जात असताना जबाबदार वनाधिकाऱ्यांनी ते काढण्याची कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या नेतृत्त्वात वनविभागाने अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता कायदा व सुव्यस्थेमुळे ते हटविता आले नाही. आठ दिवसांत अतिक्रमण काढूअमरावती : मात्र, आता वनविभागाने टेकडीवरील अतिक्रमण हटविण्याची रणनिती आखली आहे. पुढच्या आठ दिवसात ते पोलीस बंदोबस्तात हटविले जाईल, अशी माहिती आहे. या परिसरात तीन ते चार वर्षांपासून गौतम बुध्दाची मूर्ती बसविण्यात आली आहे, हे विशेष. कारवाई दरम्यान घटनास्थळी अमोल इंगळे, भन्ते संघपाल, मनोज थोरात, सुनील राऊत, विश्वास वानखडे, अनिल फुलझेले, आशिष डोंगरे, मनोज वानखडे, विश्वास भालेराव आदी उपस्थित होते. दरम्यान साकारत असलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा त्वरित हटविला जाईल, असे आश्वासन वन विभागाला अतिक्रमणधारकांनी दिले.