शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनजागेवरील मूर्ती हटविण्याचे निर्देश

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली.

आठवडाभराचा अल्टिमेटम् : सीसीएफ, डीएफओंची घटनास्थळी भेटअमरावती : येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. अतिक्रमणधारकांना मूर्ती व अन्य वस्तू त्वरेने हटविण्याचे निर्देश देण्यात आलेत.मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी वनाधिकाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमित धार्मिक स्थळी पोहोचला. या स्थळी बुध्दविहारस तयार करण्यात आले असून येथे पंचशील ध्वज उभारण्यात आला आहे. याच परिसरात नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्त्वात वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. येथे उपस्थित भन्ते संघपाल आदी कार्यकर्त्यांना हे अतिक्रमण हटविण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. आठवड्याच्या आत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण न हटविल्यास वनविभाग हे अतिक्रमण काढून घेणार, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा निर्मितीचे सुरु असलेले कार्य वनाधिकाऱ्यांनी बंद पाडले. हे अतिक्रमण दीड ते दोन वर्षांपासून असताना ते आतापर्यंत वनविभागाने का हटविले नाही, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. वनविभागाच्या टेकडीवरील दर्शनी भागात हे धार्मिक अतिक्रमण केले जात असताना जबाबदार वनाधिकाऱ्यांनी ते काढण्याची कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या नेतृत्त्वात वनविभागाने अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता कायदा व सुव्यस्थेमुळे ते हटविता आले नाही. आठ दिवसांत अतिक्रमण काढूअमरावती : मात्र, आता वनविभागाने टेकडीवरील अतिक्रमण हटविण्याची रणनिती आखली आहे. पुढच्या आठ दिवसात ते पोलीस बंदोबस्तात हटविले जाईल, अशी माहिती आहे. या परिसरात तीन ते चार वर्षांपासून गौतम बुध्दाची मूर्ती बसविण्यात आली आहे, हे विशेष. कारवाई दरम्यान घटनास्थळी अमोल इंगळे, भन्ते संघपाल, मनोज थोरात, सुनील राऊत, विश्वास वानखडे, अनिल फुलझेले, आशिष डोंगरे, मनोज वानखडे, विश्वास भालेराव आदी उपस्थित होते. दरम्यान साकारत असलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा त्वरित हटविला जाईल, असे आश्वासन वन विभागाला अतिक्रमणधारकांनी दिले.