शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

धनाढ्य सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याऐवजी भूमिपुत्रांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:43 IST

राज्यात धनाढ्य असलेल्या सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात कोट्यधीश असलेल्या या समाजाऐवजी गरजू व भूमिपुत्रांना लीज पट्टे द्यावेत, ही मागणी भूमिपुत्र हक्क आणि न्याय मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भूमिपुत्र हक्क आणि न्याय समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात धनाढ्य असलेल्या सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात कोट्यधीश असलेल्या या समाजाऐवजी गरजू व भूमिपुत्रांना लीज पट्टे द्यावेत, ही मागणी भूमिपुत्र हक्क आणि न्याय मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या निर्वासितांना, विस्थापितांना भरपाई संकोच मालमत्तेतून ज्या जमिनी देण्यात आल्यात, त्यावरील हस्तांतरण व वापर निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांद्वारा लीज पट्ट्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. या विषयात संशोधनाची गरज असून, सिंधी समाजातील कोट्यधीश व्यक्तींना या लीज पट्ट्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी गरजू भूमिपुत्रांना या जमिनी मिळाल्यास त्यांना न्याय दिल्यासारखे होईल, असे निवेदनात नमूद आहे.सिंधी समाजाप्रमाणेच झोपडपट्टीधारक शासन जमिनीवरच राहतात. आता त्यांनादेखील झोपडपट्टी रहिवासी म्हणून घोषित केले आहे. परंतु, जागेची मालकी नसल्याने अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यांनादेखील न्याय देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र हक्क आणि न्याय समितीचे नितीन देशमुख, हरिभाऊ मोहोड, मोहन पावडे, बाळासाहेब वानखडे, नितीन गुडधे, नितीन मोहोड, मोहन पुंड, विराज देशमुख आदी उपस्थित होते.