शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे ...

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता तसेच आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.

पिण्याचे पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमांमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वैयक्तिक सवयी व सार्वजनिक अस्वच्छता, नळ पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी सेवन केल्यास विविध जलजन्य आजार होऊ शकतात. त्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील जलस्रोतांची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

सद्यस्थितीत पावसाळ्यापूर्वीच या अभियानामध्ये विविध तालुक्यांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. जलसुरक्षक व आरोग्य विभागाच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी १०० टक्के जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.

ग्रामपंचायतींनी सतर्क राहून सर्व जलस्रोतांची स्वच्छता करावी. पावसाळ्यात कोणालाही दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. पाईप लाईन दुरुस्ती, गटार, नाले, साफसफाई, विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची स्वच्छता, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्यामध्ये टीसीएलचा वापर व साठवणूक आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या.