शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे ...

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता तसेच आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.

पिण्याचे पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमांमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वैयक्तिक सवयी व सार्वजनिक अस्वच्छता, नळ पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी सेवन केल्यास विविध जलजन्य आजार होऊ शकतात. त्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील जलस्रोतांची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

सद्यस्थितीत पावसाळ्यापूर्वीच या अभियानामध्ये विविध तालुक्यांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. जलसुरक्षक व आरोग्य विभागाच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी १०० टक्के जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.

ग्रामपंचायतींनी सतर्क राहून सर्व जलस्रोतांची स्वच्छता करावी. पावसाळ्यात कोणालाही दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. पाईप लाईन दुरुस्ती, गटार, नाले, साफसफाई, विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची स्वच्छता, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्यामध्ये टीसीएलचा वापर व साठवणूक आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या.