शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे ...

अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता तसेच आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.

पिण्याचे पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमांमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वैयक्तिक सवयी व सार्वजनिक अस्वच्छता, नळ पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी सेवन केल्यास विविध जलजन्य आजार होऊ शकतात. त्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील जलस्रोतांची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

सद्यस्थितीत पावसाळ्यापूर्वीच या अभियानामध्ये विविध तालुक्यांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. जलसुरक्षक व आरोग्य विभागाच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी १०० टक्के जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.

ग्रामपंचायतींनी सतर्क राहून सर्व जलस्रोतांची स्वच्छता करावी. पावसाळ्यात कोणालाही दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. पाईप लाईन दुरुस्ती, गटार, नाले, साफसफाई, विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची स्वच्छता, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्यामध्ये टीसीएलचा वापर व साठवणूक आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या.