शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पथकांद्वारा सोयाबीनची पाहणी

By admin | Updated: September 8, 2015 00:03 IST

धुक्याच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन मलूल पडत असल्याने कृषी अनुसंधानकेंद्राच्या ...

नमुने तपासणी : पथकात शास्त्रज्ञ, कृषी अधिकाऱ्यांचा समावेशअमरावती : धुक्याच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन मलूल पडत असल्याने कृषी अनुसंधानकेंद्राच्या शास्त्रज्ञांसह कृषी अधिकाऱ्यांच्या तीन पथकांनी सोमवारी तिवसा, कुऱ्हा व अंजनगाव बारी येथील सोयाबीन पिकांची पाहणी केली. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते.या वृत्ताची दखल घेऊन अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांपासून काही भागातील सोयाबीन मलुल पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पाहणी अहवाल होणार सादरअमरावती : अमरावती तालुक्यामधील अंजनगाव बारी येथील सोयाबीन पिकांची तालुका कृषी अधिकारी लाड, मंडळ अधिकारी व कृषी अनुसंधान केंद्र घातखेड्याचे शास्त्रज्ञ मेंढे व कृषी अनुसंधान केंद,्र दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ सिंग व जायले यांनी पाहणी केली. याठिकाणी सोयाबीनवर खोडअळी, कीड तसेच पावसाची दडी याचा एकत्रित परिणाम झाल्याने सोयाबीन मलूल पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तिवसा तालुक्यामधील विक्रांत वानखडे यांच्या सोयाबीनच्या शेताची प्रादेशिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मुंजे व चंदनकर तसेच मंडळ कृषी अधिकारी अनंत मस्करे यांनी पाहणी केली. याठिकाणी ‘कॉम्प्लेक्स’ स्थिती सोबतच दाट धुक्याच्या परिणामाची शक्यता देखील त्यांनी वर्तविली. येथील सोयाबीन रोपाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कुऱ्हा येथे सुरेश मुंदडा यांच्या शेतात मंडळ कृषी अधिकारी आर.डी.पाटील व पर्यवेक्षक पी.एन. भारसाकळे यांनी पाहणी करून सोयाबीन रोपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. (प्रतिनिधी)‘कॉम्प्लेक्स’ स्थितीचा परिणामअमरावती तालुका कृषी अधिकाऱ्यांसह घातखेडा व दुर्गापूर येथील शास्त्रज्ञांनी अंजनगाव बारी, भानखेड येथील सोयाबीन पिकांची पाहणी केली. याठिकाणी धुक्याचा नव्हे तर पावसाचा ताण, किडींचा प्रादुर्भाव, मोझॅकचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. यामुळे उत्पन्नात सरासरी ३० टक्क्यांनी घट येऊ शकते. यासाठी करावयाच्या व्यवस्थापनाचा अहवाल दिल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी सांगितले.अमरावती तालुक्यात कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी सोयाबीनची पाहणी केली त्यांच्याशी चर्चा केली असता पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान, खोड किडीमुळे कॉम्प्लेक्स स्थिती निर्माण होऊन सोयाबीन मलूल पडत आहे. - दत्तात्रेय मुळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी