शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: June 1, 2015 00:42 IST

नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद ...

मृद आरोग्य अभियान : १७ हजार नमुने तपासणारगजानन मोहोड अमरावतीनैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये १७ हजार ७४७ मृद नमुन्यांच्या तपासणीचे कृषी विभागाचे नियोजन आहे. अमरावती तालुक्यातील १ हजार २६३, भातकुली १ हजार २७४, चांदूररेल्वे १ हजार २९७ व तिवसा तालुक्यातील १ हजार २७२ नमुन्यांची जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अमरावती येथे तपासणी होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही १ हजार २७०, दर्यापूर तालुक्यातील १ हजार २७०, अंजनगाव सुर्जी १ हजार २७८, मोर्शी १ हजार २८२ व वरुड तालुक्यातील १ हजार २७० अशा एकूण ६ हजार ३७१ मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे केली जाणार आहे. धामणगाव तालुक्यामधील १ हजार २२०, चांदूरबाजार तालुक्यातील १ हजार २६९, अचलपूर तालुक्यामधील १ हजार ५५२, धारणी तालुक्यामधील १ हजार २६८ व चिखलदरा तालुक्यातील ९६१ अशा एकूण ६ हजार २७० मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील ३९८ गावामधील ६ हजार २०३ बागायती मृद नमुने व ११ हजार ५४४ जिरायती मृद नमुने तपासण्यात येणार आहेत. अन्य ५५ गावे प्रतीक्षा यादीत आहेत. केंद्र शासनाच्या स्वाईल हेल्थ कार्ड या अभियानामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीचे आरोग्य तपासता येणार आहे. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोतसिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीचा पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यामुळे कमतरता भरून काढण्यास मदत होते. मातीमध्ये आहेत१६ ते २० घटकजिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २० घटक आढळून येतात. यामध्ये नत्र व स्फुरद कमी आहेत. याशिवाय सुक्ष्म खते, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.