शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: June 1, 2015 00:42 IST

नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद ...

मृद आरोग्य अभियान : १७ हजार नमुने तपासणारगजानन मोहोड अमरावतीनैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये १७ हजार ७४७ मृद नमुन्यांच्या तपासणीचे कृषी विभागाचे नियोजन आहे. अमरावती तालुक्यातील १ हजार २६३, भातकुली १ हजार २७४, चांदूररेल्वे १ हजार २९७ व तिवसा तालुक्यातील १ हजार २७२ नमुन्यांची जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अमरावती येथे तपासणी होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही १ हजार २७०, दर्यापूर तालुक्यातील १ हजार २७०, अंजनगाव सुर्जी १ हजार २७८, मोर्शी १ हजार २८२ व वरुड तालुक्यातील १ हजार २७० अशा एकूण ६ हजार ३७१ मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे केली जाणार आहे. धामणगाव तालुक्यामधील १ हजार २२०, चांदूरबाजार तालुक्यातील १ हजार २६९, अचलपूर तालुक्यामधील १ हजार ५५२, धारणी तालुक्यामधील १ हजार २६८ व चिखलदरा तालुक्यातील ९६१ अशा एकूण ६ हजार २७० मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील ३९८ गावामधील ६ हजार २०३ बागायती मृद नमुने व ११ हजार ५४४ जिरायती मृद नमुने तपासण्यात येणार आहेत. अन्य ५५ गावे प्रतीक्षा यादीत आहेत. केंद्र शासनाच्या स्वाईल हेल्थ कार्ड या अभियानामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीचे आरोग्य तपासता येणार आहे. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोतसिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीचा पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यामुळे कमतरता भरून काढण्यास मदत होते. मातीमध्ये आहेत१६ ते २० घटकजिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २० घटक आढळून येतात. यामध्ये नत्र व स्फुरद कमी आहेत. याशिवाय सुक्ष्म खते, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.