शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:19 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली.

ठळक मुद्देशासनाचा अहवाल : यंदा पाच महिन्यांत ९५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. यामध्ये तीन जनांचा मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. कीटकनाशक कंपन्यांद्वारा शेतकºयांना सुविधेची साधने पुरवीत नसल्यानेच फवारणी शेतकºयांच्या जीवावर उठली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत ५०५ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली. यामध्ये २०१२ मध्ये ७२, सन २०१३ मध्ये ५५, सन २०१४ मध्ये ६२, सन २०१५ मध्ये ५७, सन २०१६ मध्ये ५० तर सन २०१६ मध्ये सर्वाधिक २०९ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची विषबाधा झाली. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात २० तर विदर्भात ३५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कीटकनाशकांचा फवारणी ही मृत्यूचीच फवारणी असल्याची बाब प्रथम उघडकीस आली. त्यानंतर शासनाने याविषयी गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाद्वारा याविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी यावर प्रभावी अंलबजावणी नसल्यामुळेच सध्याही शेतकरी विषबाधित होत असल्याचे वास्तव आहे.पेरणीनंतरच्या चार महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणवर विषबाधितांचे प्रकरण समोर येत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ३, मार्च ५, एप्रिल ३, मे ६, जून १०, जुलै १७, आॅगस्ट ३५, सप्टेेंबर ६२ आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर २६ व डिसेंबर महिन्यात ४ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.२.१० लाखांच्या साठ्यास विक्रीबंदचे आदेशगुण नियंत्रण पथकाने जिल्ह्यातील कीटकनाशकांचे १२२ सॅम्पल घेतले. यामध्ये ५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. ९१५ परवान्यांची तपासणी केली असता ५५७ मे.टन साठ्यास विक्रीबंदचे आदेश देण्यात आले. याची किमंत २.१० लाख आहे. विभागीय गुण नियंत्रण पथकाने अखेर ही कारवार्ई केल्याचे कृषी विभागाने सांगितले.