शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:19 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली.

ठळक मुद्देशासनाचा अहवाल : यंदा पाच महिन्यांत ९५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. यामध्ये तीन जनांचा मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. कीटकनाशक कंपन्यांद्वारा शेतकºयांना सुविधेची साधने पुरवीत नसल्यानेच फवारणी शेतकºयांच्या जीवावर उठली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत ५०५ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली. यामध्ये २०१२ मध्ये ७२, सन २०१३ मध्ये ५५, सन २०१४ मध्ये ६२, सन २०१५ मध्ये ५७, सन २०१६ मध्ये ५० तर सन २०१६ मध्ये सर्वाधिक २०९ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची विषबाधा झाली. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात २० तर विदर्भात ३५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कीटकनाशकांचा फवारणी ही मृत्यूचीच फवारणी असल्याची बाब प्रथम उघडकीस आली. त्यानंतर शासनाने याविषयी गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाद्वारा याविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी यावर प्रभावी अंलबजावणी नसल्यामुळेच सध्याही शेतकरी विषबाधित होत असल्याचे वास्तव आहे.पेरणीनंतरच्या चार महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणवर विषबाधितांचे प्रकरण समोर येत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ३, मार्च ५, एप्रिल ३, मे ६, जून १०, जुलै १७, आॅगस्ट ३५, सप्टेेंबर ६२ आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर २६ व डिसेंबर महिन्यात ४ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.२.१० लाखांच्या साठ्यास विक्रीबंदचे आदेशगुण नियंत्रण पथकाने जिल्ह्यातील कीटकनाशकांचे १२२ सॅम्पल घेतले. यामध्ये ५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. ९१५ परवान्यांची तपासणी केली असता ५५७ मे.टन साठ्यास विक्रीबंदचे आदेश देण्यात आले. याची किमंत २.१० लाख आहे. विभागीय गुण नियंत्रण पथकाने अखेर ही कारवार्ई केल्याचे कृषी विभागाने सांगितले.