शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आरक्षित भूखंडाची गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशी

By admin | Updated: March 14, 2015 00:30 IST

पॅराडाइज कॉलनीतील भाजी बाजार व सूतिकागृहाच्या आरक्षित जागेवर भूखंड पाडून ते विकल्याप्रकरणी व तक्रारकर्त्याला मारहाण करुन त्याचेवर पोलिसात खोटे गुन्हे ...

लोकमत विशेषसुनील देशपांडे अचलपूरपॅराडाइज कॉलनीतील भाजी बाजार व सूतिकागृहाच्या आरक्षित जागेवर भूखंड पाडून ते विकल्याप्रकरणी व तक्रारकर्त्याला मारहाण करुन त्याचेवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटलांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. भूखंड घोटाळ्यात एका नगरसेविकेचा पुत्र व एक माजी नगरसेवक अडकण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी शहरातील रथी-महाराथींनी प्रयत्न चालविले आहे. यासंबंधी पोलिसांनी नगरपालिकेकडून मागवलेली माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही. पॅराडाइज कॉलनी तथा खेल त्र्यंबक नारायण सर्वे क्रमांक १८/२ येथे शरीफाबी वंजारा व अफसाना वंजारा यांच्यातर्फे मुख्त्यारपत्रधारक म. असलम अहमद वंजारा यांनी २००३-०४ मध्ये भूखंड पाडून विकले होते. येथील २४७३.७५ स्केअर फूट जागा भाजीबाजार व सुतिकागृहासाठी राखीव होती. या आरक्षित जागेवर नगररचना कार्यालयाची तथा कुठल्याही संबंधित विभागाची परवानगी न घेता भूखंड पाडून २० जणांना विकण्यात आले होते. ही खरेदी-विक्री दुय्यम निबंधक कार्यालयात १७ डिसेंबर २०१३ रोजी झाली असून शेताच्या नावाने खरेदी करुन देण्यात आली. या भूखंडाची खरेदी श्याम इब्राहीम नबील, मो. फईम मो. रशीद यांचेसह २० जणांनी केली. या आरक्षित जागेचा कुठलाही सातबाराचा उतारा नसताना सहदुय्यम निबंधकांनी याची खरेदी-विक्री कशी केली, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. आरक्षित जागेतील एका भूखंडावर फईम यांनी बांधकाम सुरू केले. हे अवैध बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तेथे नळही दिला होता, अशी माहिती आहे. याची लेखी तक्रार भाजपा अल्संख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजहर शेख यांनी न.पा.चे मुख्याधिकाऱ्यांकडे ९ जून २०१४ रोजी केली होती. त्यावर वैद्यकीय अधिकारी मेराज अली सेवानिवृत्त शिक्षिका अफरोज जहाँ अब्दुल मजीद मो. अतिक, अब्दुल कुद्रूस सै. समीर, लुबना खान यांचेसह आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. याच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन आदींना देण्यात आल्या होत्या. त्याची तक्रार जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे करण्यात आली होती. तक्रारी अर्जातील काही स्वाक्षरीधारकांकडून स्वाक्षरी मागे घेण्यास वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यास भाग पाडण्यात आल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.