शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

आरक्षित भूखंडाची गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशी

By admin | Updated: March 14, 2015 00:30 IST

पॅराडाइज कॉलनीतील भाजी बाजार व सूतिकागृहाच्या आरक्षित जागेवर भूखंड पाडून ते विकल्याप्रकरणी व तक्रारकर्त्याला मारहाण करुन त्याचेवर पोलिसात खोटे गुन्हे ...

लोकमत विशेषसुनील देशपांडे अचलपूरपॅराडाइज कॉलनीतील भाजी बाजार व सूतिकागृहाच्या आरक्षित जागेवर भूखंड पाडून ते विकल्याप्रकरणी व तक्रारकर्त्याला मारहाण करुन त्याचेवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटलांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. भूखंड घोटाळ्यात एका नगरसेविकेचा पुत्र व एक माजी नगरसेवक अडकण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी शहरातील रथी-महाराथींनी प्रयत्न चालविले आहे. यासंबंधी पोलिसांनी नगरपालिकेकडून मागवलेली माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही. पॅराडाइज कॉलनी तथा खेल त्र्यंबक नारायण सर्वे क्रमांक १८/२ येथे शरीफाबी वंजारा व अफसाना वंजारा यांच्यातर्फे मुख्त्यारपत्रधारक म. असलम अहमद वंजारा यांनी २००३-०४ मध्ये भूखंड पाडून विकले होते. येथील २४७३.७५ स्केअर फूट जागा भाजीबाजार व सुतिकागृहासाठी राखीव होती. या आरक्षित जागेवर नगररचना कार्यालयाची तथा कुठल्याही संबंधित विभागाची परवानगी न घेता भूखंड पाडून २० जणांना विकण्यात आले होते. ही खरेदी-विक्री दुय्यम निबंधक कार्यालयात १७ डिसेंबर २०१३ रोजी झाली असून शेताच्या नावाने खरेदी करुन देण्यात आली. या भूखंडाची खरेदी श्याम इब्राहीम नबील, मो. फईम मो. रशीद यांचेसह २० जणांनी केली. या आरक्षित जागेचा कुठलाही सातबाराचा उतारा नसताना सहदुय्यम निबंधकांनी याची खरेदी-विक्री कशी केली, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. आरक्षित जागेतील एका भूखंडावर फईम यांनी बांधकाम सुरू केले. हे अवैध बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तेथे नळही दिला होता, अशी माहिती आहे. याची लेखी तक्रार भाजपा अल्संख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजहर शेख यांनी न.पा.चे मुख्याधिकाऱ्यांकडे ९ जून २०१४ रोजी केली होती. त्यावर वैद्यकीय अधिकारी मेराज अली सेवानिवृत्त शिक्षिका अफरोज जहाँ अब्दुल मजीद मो. अतिक, अब्दुल कुद्रूस सै. समीर, लुबना खान यांचेसह आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. याच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन आदींना देण्यात आल्या होत्या. त्याची तक्रार जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे करण्यात आली होती. तक्रारी अर्जातील काही स्वाक्षरीधारकांकडून स्वाक्षरी मागे घेण्यास वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यास भाग पाडण्यात आल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.