शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री चालणाऱ्या सहकारी संस्थांवर टाच

By admin | Updated: July 4, 2015 00:46 IST

केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत.

सहकार विभागाचा निर्णय : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षणजितेंद्र दखने अमरावतीकेवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी आता सहकार विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत थेट गावागावांत जाऊन सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे बंद संस्थांवर टाच येणार आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहेत. काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्थांची स्थापना झाली. पण उद्देश सफल झाल्यावर या संस्थांकडे संचालक व संस्थापकांनीही पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कर्ज घेतले. मात्र कर्जाची परतफेडच करण्यात आले नाही. त्यामुळे संस्था अडचणीत आल्यात. यामध्ये पतसंस्थांचा सर्वाधिक समावेश आहे. गृहनिर्माण संस्था आणि पाणी वापर संस्था नेमक्या कुठे आहे, याचा शोध घेणेही अवघड झालेले आहे. या सर्व परिस्थितीत सहकार विभागाकडून वारंवार सहकारी संस्थांना आॅडिट करून घेण्याच्या सूचना करूनही बऱ्याच संस्थांचे आॅडिट झालेले नाहीत, तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहितीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही संस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची नेमकी स्थिती काय, याचे सर्वेक्षण प्रत्येक गावात जाऊन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यासाठी येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत जाऊन नोंदणी झालेल्या प्रत्येक संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ज्या संस्थांचा ठावठिकाणाच नाही अशा संस्था तातडीने बंद केल्या जाणार आहेत. यासाठी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक जुलैपासून सर्वेक्षण व शोध मोहिमेत सहभागी होणार आहेत. ज्या संस्थांचे कामकाजच सुरू नाही त्यांनी पुन्हा संस्था चालविण्याची तयारी दर्शविल्यास एकवेळ संधी दिली जाणार आहे. या सर्वेक्षणांती आजपर्यंत कागदोपत्री सुरू असलेल्या संस्था बंद होणार असून जिल्ह्यातील सहकारी संस्थांची स्वच्छताच या मोहिमेतून होणार आहे. (प्रतिनिधी)सर्वेक्षणातून काय उघड होणार?जिल्ह्यात सध्या २५४९ सहकारी संस्था असून २ हजार ३५० संस्था आॅनलाईन सुरू आहेत, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. उर्वरित संस्था एकतर बंद किंवा कागदोपत्री असणार आहेत. त्यापैकी पाणी वापर संस्था आणि गृहनिर्माण संस्था शोधणे सहकार विभागाला अडचणीचे वाटत आहे. या सर्वेक्षणातून चांगल्या सहकारी संस्था नेमक्या किती ही माहिती उघड होणार आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण येत्या १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत केले जाणार आहे. यासाठी सहकार विभागाने तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुका उपनिबंधक यांना सर्वेक्षणासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. यामधून चांगल्या सहकारी संस्था व बंद असलेल्या संस्था याची खरी माहिती या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे. - प्रेम राठोड,सहायक जिल्हा उपनिबंधक, अमरावती.