शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पोलिसांची अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:18 IST

नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला.

ठळक मुद्देबर्थ डे पार्टी उधळली : विद्यापीठासमोरील प्रतिष्ठानातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला. या मारहाणीत राजू तिवारी, ज्योती तिवारी, राहुल तिवारी, सरताजसिंग अजितसिंग रिहाल, सुजितसिंग, अजितसिंग रिहाल, मनीष अहिरे, सरताज, अर्चना अहिरे, कोमल उके जखमी झाले. पीडितांनी सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे घटनेची चौकशी सोपविण्यात आली आहे.राजू तिवारी यांचा मुलगा राहुल याच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत डीजे वाजविण्यात आला. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाºया ध्वनीप्रदूषणाबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार गाडगेनगर ठाण्याचे चार्ली कमाण्डो शिपाई संदीप चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रात्रीचे १० वाजून गेले होते. डीजे बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी तिवारी यांना दिल्यात. डीजे सुरूच असल्याने पुन्हा तक्रार झाली.पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. डीजे बंद करण्याच्या मुद्यावरून आयोजक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. मुद्दा तापू लागला. संतप्त पोलिसांनी वाद घालणाºयांवर तुफान लाठीमार केला. पार्टी उधळून लावली, असा आरोप बर्थ-डे पार्टीचे अयोजक तिवारी आणि मंडळींनी केला आहे. दरम्यान, राजू तिवारी, ज्योती तिवारी, सरताजसिंग अजितसिंग रिहाल, सुजितसिंग, अजितसिंग रिहाल व अन्य १० ते १५ जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कायद्याचे पालन न करता ध्वनीप्रदूषण पसरवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.जयस्तंभ चौकात निषेधराजू तिवारी कुटुंबीयांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीसंदर्भात जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसून निषेध नोंदविला. यावेळी काही राजकीय पदाधिकाºयांनीही पोलिसांच्या या अमानुष अत्याचाराचा विरोध करून तिवारी कुटुंबीयांना समर्थन दिले. त्यानंतर तिवारी कुटुंबीय पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते.महिलांशी धक्काबुक्कीवाढदिवसांच्या पार्टीत तिवारी कुटुंबातील महिलांची उपस्थिती होती. पोलिसांनी कार्यक्रम उधळून लावल्यानंतर तिवारी कुटुंबीयांनी विरोध केला. दरम्यान पोलिसांनी महिलांना ओढाताण करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप तिवारी कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी महिलांच्या अंगावरील दागिने तुटल्याने विखुरल्याचा आरोप महिलांनी केला आहे.पोलीस ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ होण्याचे कारण काय ?बर्थ-डे पार्टीदरम्यान पोलिसांसोबत नेमके काय घडले, ज्यामुळे ते अ‍ॅग्रेसिव्ह झाले. त्यांनी राजू तिवारीसह अन्य नागरिकांना अमानुष मारहाण केली, हे गुलदस्त्यात आहे. राजू तिवारी हा पोलीस रेकॉर्डवर आहे. त्याचा हद्दपारीचा आदेश निघाल्याचेही पोलीस सांगत आहे. मात्र, घटनेवेळी नेमके घडले काय, याचा शोध पोलीस घेत आहे.दोषींना निलंबित करावाढदिवसाच्या दिवशी पार्टी उधळून अमानुष लाठीचार्ज करणाºया व महिलेवर हात उगारणाºया दोषी पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी (ओबीसी) मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केली आहे. पोलिसांच्या या अमानुष मारहाणीचा निषेध त्यांनी नोंदविला.या घटनेचे नेमके कारण काय, दोषी कोण, याचा शोध घेण्यासाठी डीसीपींकडे चौकशी सोपविली आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल. माझी पोलीस यंत्रणा आक्रमक होण्यामागे वेगळे कारण असू शकते.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त