शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

अमानुष मारहाण... सराट्याचे चटके... तरीही चिमुकलीची आस...

By admin | Updated: November 10, 2014 22:34 IST

मुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले..

गणेश वासनिक - अमरावतीमुळात पती-पत्नीचे नातेच विश्वासाचे. पण, तिचे लग्नच खोट्या माहितीवर जुळलेले...तरीही तिने जुळवून घेतले...उद्याच्या सुस्वप्नांची आस घेऊन ती जगत राहिली...दैवाने पदरी एक सुंदर कन्यारत्न घातले...पण तिच्या हाल-अपेष्टा काही संपल्या नाहीत..नशिबी आलेली मारहाण, उपासमार सोसताना अर्धमेली झालेली ती सध्या सासरच्या अत्याचारामुळे इर्विन रूग्णालयात उपचार घेतेय..सासरच्यांनी हिसकावून घेतलेली लाडकी लेक परत मिळवायचीच..या निश्चयासह लढते आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) या खेडेवजा गावातील दीपमालाची कथा अंगावर शहारे आणणारी आहे. अमरावती शहरातील कमिश्नर कॉलनी येथील पंजाबराव तायवाडे यांची कन्या दीपमाला हिचा विवाह २००९ साली अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (गावंडगाव) येथील लव्हाळे कुटंबातील विनोद नामक युवकासोबत झाला. बोलणीदरम्यान मुलाला खासगी आयुर्विमा कंपनीत नोकरी असल्याचे सांगितले गेले. मात्र, लग्नानंतर विनोदला नोकरी नसल्याचे समजले. तरीही दीपमालाने परिस्थितीशी जुळवून घेत संसार सुरू केला. कालांतराने त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, मुलगी झाल्याने दीपमालाच्या सासरच्यांनी तिचा छळ सुरु केला. माहेरहून पैसे आणण्यासाठी दीपमालाचा छळ होऊ लागला. अनेकदा सासरच्यांची पैशांची मागणी दीपमालाने वडिलांना सांगून पूर्णही केली. परंतु तरीही कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन सतत मारहाण, टोचून बोलणे, आई- वडिलांना शिवीगाळ हा प्रकार नित्याचाच झाला होता. तरीही दीपमालाने चिमुकल्या विधिशा नामक चिमुरडीसाठी हे सर्व सहन केले. मात्र, सासरच्या मंडळींनी हळूहळू मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. एक, दोन नव्हे तर चक्क आठ दिवस दीपमाला हिला उपाशी ठेवले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी..येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्र. १४ मध्ये उपचार घेणाऱ्या दीपमाला लव्हाळे हिचे पूर्ण लक्ष चार वर्षांच्या चिमुरड्या विधीशाकडे लागले आहे. विधीशा हिला तिच्यापासून दूर करण्यासाठी सासरची मंडळी षडयंत्र रचत असली तरी विधिशाला स्वत:पासून कधीही दूर होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार दीपमालाने केला आहे. मुलीला मिळविण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याचीदेखील तिची तयारी आहे. पोलीस आयुक्तांकडून न्यायाची अपेक्षासासरच्या लोकांनी आठ दिवस उपाशी ठेवले. सतत मारहाण केली. त्यानंतर वाहनाने माहेरी आणून अक्षरश: फेकून दिले. ही अतिशय गंभीर बाब असतानादेखील आतापर्यंत फ्रेजरपुरा पोलिसांनी दीपमाला हिला अमानुष मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले नाही. पोलीस केवळ कागदी घोडे नाचवित असून तिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न दीपमाला हिच्या माहेरच्यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना केला आहे.