शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राज्यात होणार तीन नवीन पोलीस आयुक्तालये, रणजित पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 18:48 IST

 लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

अमरावती- लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड व ठाणे येथील मीरा भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन आहे.  

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गुन्हेगारीही वाढत आहे. यावर अंकुश ठेवणे आणि गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ व कार्यालयीन क्षेत्र कमी पडत आहे. अशावेळी पोलीस यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर अंकुश बसविणे कठीण जात आहे. या अनुषंगाने राज्यातील तीन ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. १५ ते २० वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित असून आता या प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. राज्य शासन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार आहे.   

पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधीराज्यातील पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २ लाख मनुष्यबळाच्या अनुषंगाने या वसाहतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्रात आणखी तीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना केली जाणार आहे. तेथील केसेस, लोकसंख्या आणि मनुष्यबळाची आवश्यकता यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहे. - रणजित पाटील, गृहराज्यमंत्री