शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात होणार तीन नवीन पोलीस आयुक्तालये, रणजित पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 18:48 IST

 लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

अमरावती- लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड व ठाणे येथील मीरा भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन आहे.  

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गुन्हेगारीही वाढत आहे. यावर अंकुश ठेवणे आणि गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ व कार्यालयीन क्षेत्र कमी पडत आहे. अशावेळी पोलीस यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर अंकुश बसविणे कठीण जात आहे. या अनुषंगाने राज्यातील तीन ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. १५ ते २० वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित असून आता या प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. राज्य शासन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार आहे.   

पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधीराज्यातील पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २ लाख मनुष्यबळाच्या अनुषंगाने या वसाहतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्रात आणखी तीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना केली जाणार आहे. तेथील केसेस, लोकसंख्या आणि मनुष्यबळाची आवश्यकता यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहे. - रणजित पाटील, गृहराज्यमंत्री