शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

बाधित सोयाबीनला शासन मदत, विमा भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:01 IST

सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनितीन धांडेची मागणी : आरडीसींना निवेदन, हजारो हेक्टरमध्ये नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततच्या पावसामुळे धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. फवारणीचा फारसा उपयोग झालेला नाही. सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा व आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन पिकाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ झालेली नाही. आॅगस्ट अखेरपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. या प्रतिकूल वातावरणामुळे फवारणीपश्चातही सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.सद्यस्थितीत सोयाबीन पिकाला अत्यल्प शेंगा आहेत. सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नितीन धांडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रशांत वैद्य, अविनाश ब्राम्हणवाडे, मंगेश तुपट, अमोल सोनटक्के, सुरेश खटाळे, विठ्ठल सुरोशे, विठ्ठलराव पवार, पुंजाराम पाचमोहोर, प्रमोद सोनटक्के, तुकाराम सोनटक्के, भीमराव राऊत, संदीप सुरोशे, माणिकराव चोपडे, शालिग्राम तुपट, प्रकाश तुपट, सुभाष तुपट, सुभाष ठाकरे, बाबाराव सोनटक्के, दादाराव पवार, किशोर मोरे, रितेश कोल्हे यांच्यासह धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंचित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्याशासनाने शेतकºयांचे कर्जमाफ केले असले तरी महसूल विभाग व बँका यांच्यातील समन्वयाअभावी बहुतांश कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यांनाही तातडीने लाभ मिळावा. हरभºयाचे प्रलंबित अनुदान मिळावे आदी मागण्या नितीन धांडे यांनी निवेदनातून मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकाºयांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागाला याविषयी तातडीने कळवून सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Socialसामाजिक