शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बाधित सोयाबीनला शासन मदत, विमा भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:01 IST

सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनितीन धांडेची मागणी : आरडीसींना निवेदन, हजारो हेक्टरमध्ये नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततच्या पावसामुळे धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. फवारणीचा फारसा उपयोग झालेला नाही. सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा व आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन पिकाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ झालेली नाही. आॅगस्ट अखेरपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. या प्रतिकूल वातावरणामुळे फवारणीपश्चातही सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.सद्यस्थितीत सोयाबीन पिकाला अत्यल्प शेंगा आहेत. सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नितीन धांडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रशांत वैद्य, अविनाश ब्राम्हणवाडे, मंगेश तुपट, अमोल सोनटक्के, सुरेश खटाळे, विठ्ठल सुरोशे, विठ्ठलराव पवार, पुंजाराम पाचमोहोर, प्रमोद सोनटक्के, तुकाराम सोनटक्के, भीमराव राऊत, संदीप सुरोशे, माणिकराव चोपडे, शालिग्राम तुपट, प्रकाश तुपट, सुभाष तुपट, सुभाष ठाकरे, बाबाराव सोनटक्के, दादाराव पवार, किशोर मोरे, रितेश कोल्हे यांच्यासह धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंचित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्याशासनाने शेतकºयांचे कर्जमाफ केले असले तरी महसूल विभाग व बँका यांच्यातील समन्वयाअभावी बहुतांश कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यांनाही तातडीने लाभ मिळावा. हरभºयाचे प्रलंबित अनुदान मिळावे आदी मागण्या नितीन धांडे यांनी निवेदनातून मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकाºयांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागाला याविषयी तातडीने कळवून सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Socialसामाजिक