शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

भारताच्या नकाशात अंदमान-निकोबार का नाहीत?

By admin | Updated: July 18, 2016 01:16 IST

अंदमान-निकोबारसह लक्षद्विप ही बेटे भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक असतांना तो भूभाग नकाशात का दर्शविला जात नाही,

शासनाचे दुर्लक्ष : संतोष बालेकर यांचा पत्रपरिषदेत सवाल अमरावती :अंदमान-निकोबारसह लक्षद्विप ही बेटे भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक असतांना तो भूभाग नकाशात का दर्शविला जात नाही, असा सवाल संतोष बालेकर यांनी उपस्थित केला.या संदर्भात त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. बालेकर यांनी केंद्र शासनाच्या दिल्ली स्थित सिमा निर्देशालय विभागाकडे ५५ तक्रारी पाठविल्या आहेत. मात्र, यासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत.असा दावा त्यांनी केला. भारतीय भूभागातील अंदमान-निकोबार व लक्षव्दिप ही बेटे भारताच्या नकाशात वगळण्यात येत असल्याचे संतोष बालेकर यांच्या निदर्शनास आले.विविध संघटना, शैक्षणिक आस्थापना, सरकारचे विविध मंत्रालय, अंगिकृत संस्था, विद्यापीठ, भारताचे मानचित्राचा उपयोग करताना ही बेटे नकाशात समाविष्ट करित नाहीत. त्या अनुषंगाने बालेकर यांनी १४ आॅगस्ट २००७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. समाजावर विपरित परिणाम अमरावती : या तक्रारी शासनाने संबधित विभागाकडे पाठविल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे बालेकर यांचे मत आहे. इतका महत्वाचा व राष्ट्रीय विषय असतानाही शासनाने आपल्या तक्रारी वजा माहितीकडे लक्ष दिले नाही. १३ वर्षांपासून आपण या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याचे बालेकर म्हणाले. नॅशनल मॅप पॉलिसी २००५ नुसार नकाशा प्रकाशित करताना नकाशात हे तिन्ही बेटे दर्शविणे आवश्यक आहे, असे नमुद आहे. तरीसुध्दा या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज असल्याची माहिती बालेकर यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतीय नागरिकांना देशाच्या नकाशाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तिन्ही बेट भारताचाच एक भाग असल्याचे नागरिकांना समजणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांनी नकाशात ही बेटे न दर्शविल्याने नागरिकांना या बेटाविषयी माहिती नसल्याचे ते म्हणाले.