शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

देशातील पहिल्या डिजिटल संत्रा मंडईला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:38 IST

वरुडात बाजार समिती आणि फ्रूटएक्स कंपनीचा उपक्रम, दिवसाला १०० टन लिलाव

- संजय खासबागे

वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांना आणलेल्या संत्र्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या या उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

वरूड, मोर्शी तालुक्यात आंबिया आणि मृग बहारच्या संत्र्याचे हजारो टन उत्पादन घेतले जाते. परंतु ऐनवेळी परप्रांतासह बांगलादेशात भाव कोसळले की, याचा फटका थेट संत्रा उत्पादकांना बसतो. यंदा व्यापारीदेखील संत्राबागेकडे फिरकले नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी डिजिटल संत्रा मंडईसाठी वरूड कृषिउत्पन्न बाजार समिती आणि फ्रूट एक्स कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

कंपनीकडून स्थापित यंत्रातून संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करून ते क्रेटमध्ये आपोआप पडतात. त्यानंतर त्याचा देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित व्यापारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत लिलाव केला जातो. यामुळे संत्र्याला चांगला दर मिळत आहे. देशातील पहिली डिजिटल संत्रा मंडई म्हणून येथील बाजार समितीच्या संत्रा मंडईला मान मिळाला. ग्रेडेशनमुळे टाकाऊ संत्रीसुद्धा विकली जात आहेत. याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला १०० टन संत्री विकली जात आहेत. 

देशांतर्गत सफरचंदासह विविध फळांचे ग्रेडेशन, विक्री करणाऱ्या हैदराबाद येथील फ्रूट एक्सने विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड परिसरात पहिल्यांदाच संत्र्याच्या लिलावासाठी सामंजस्य करार केला आहे. कंपनीने बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईमध्ये ग्रेडिंग युनिट उभारले. यामध्ये ७५ पैसे प्रतिकिलो दराने संत्रा ग्रेडिंग, भराई आणि ग्रेडिंगनुसार लिलाव करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. प्रतवारीनुसार संत्रा विक्री करून वेळीच शेतकऱ्यांना पैसे दिल्या जाते.

मिळतो योग्य दरडिजिटल संत्रा लिलाव मंडईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याचे ग्रेडेशन होऊन ते क्रेटमध्ये पडतात आणि त्यानंतर विकले जातात. सर्वोच्च गुणवत्तेच्या फळांसाठी लिलावात ४५ ते ४० रुपये किलो दर मिळतो, तर निम्नस्तर संत्रीसुद्धा २० रुपये किलोने जातात. 

आता शेतकरीच घेऊन येतात संत्री पूर्वी संत्राबागेतील फळे उतरविण्यासाठी व्यापाऱ्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असायची. आता थोडा त्रास होत असला तरी योग्य दर मिळत असल्याने शेतकरी संत्री मंडईत आणत असल्याचे चित्र आहे. देशात पहिला डिजिटल संत्रा बाजार संत्रा उत्पादकांना फायदेशीर ठरला आहे. पारदर्शक लिलाव पद्धत, ग्रेडेशन करून विक्री केली जाते. त्याचा जिल्हाभरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.- नरेंद्र पावडे, बाजार समिती सभापती, वरूड

टॅग्स :Amravatiअमरावती