शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

भारत महासत्ता होणार!

By admin | Updated: October 15, 2016 03:36 IST

सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून

अमरावती : सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून ‘विश्वबंधुभाव’ हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्याने भारत जगातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक विजय भटकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी चिंतन कार्यक्रमातून विजय भटकर संबोधित करीत होते. ते म्हणाले, सुपर कॉम्प्युटर क्षणात गणिताच्या कोट्यवधी किचकट प्रक्रिया करतो. असेच कार्य राष्ट्रसंतांच्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेतून होते. जगात १० हजार वर्षांत अनेक संस्कृती उदयास आल्या व लोपदेखील पावल्या. परंतु भारतीय संस्कृती अद्याप जिवंत आहे. आम्ही त्याचे वारसदार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.चिंतन कार्यक्रमापूर्वी भटकर यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा व मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पदन्यास, लेझीम व दिंडी काढण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने होतात. या सर्वांचा एकत्रित मेळ घालण्याकरिता या महोत्सवात शनिवारी खंजेरी भजन संमेलन दोन दिवस व दोन सत्रांत आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी सामुदायिक ध्यान, चिंतन, योगासन व प्राणायाम, ग्रामगीता प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, कीर्तन आदी कार्यक्रमही होतील. (प्रतिनिधी)