शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारत महासत्ता होणार!

By admin | Updated: October 15, 2016 03:36 IST

सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून

अमरावती : सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून ‘विश्वबंधुभाव’ हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्याने भारत जगातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक विजय भटकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी चिंतन कार्यक्रमातून विजय भटकर संबोधित करीत होते. ते म्हणाले, सुपर कॉम्प्युटर क्षणात गणिताच्या कोट्यवधी किचकट प्रक्रिया करतो. असेच कार्य राष्ट्रसंतांच्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेतून होते. जगात १० हजार वर्षांत अनेक संस्कृती उदयास आल्या व लोपदेखील पावल्या. परंतु भारतीय संस्कृती अद्याप जिवंत आहे. आम्ही त्याचे वारसदार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.चिंतन कार्यक्रमापूर्वी भटकर यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा व मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पदन्यास, लेझीम व दिंडी काढण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने होतात. या सर्वांचा एकत्रित मेळ घालण्याकरिता या महोत्सवात शनिवारी खंजेरी भजन संमेलन दोन दिवस व दोन सत्रांत आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी सामुदायिक ध्यान, चिंतन, योगासन व प्राणायाम, ग्रामगीता प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, कीर्तन आदी कार्यक्रमही होतील. (प्रतिनिधी)